शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: June 29, 2016 03:02 IST

राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे.

लोकसहभाग हवा : १ जुलैसाठी वन विभाग सज्जजीवन रामावत  नागपूरराष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात केवळ २० टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. शिवाय यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल असून, इतर चार टक्के हा विरळ आहे. त्यामुळे या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करून, राज्यातील वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी हा दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र वन विभाग येथेच थांबणार नसून, पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी सांगितले. येत्या १ जुलै रोजी राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी पीसीसीएफ भगत यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भगत म्हणाले, एवढी मोठी वृक्ष लागवड केवळ वन विभाग करू शकत नाही. त्यामुळे यात लोकसहभाग आवश्यक आहे. वन विभाग आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवर्षी चार ते पाच कोटी वृक्ष लागवड करीत असतो. परंतु आता या कामात लोकसहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ज्या जमिनीवरील वृक्ष कटाई करण्यात आली, अशाही लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वन विभागाने १ कोटी ५० लाख वृक्ष लागवडीची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवाय उर्वरित ५० लाख वृक्ष लागवड ही विविध शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासंबंधी राज्य शासनाने मागील ३१ मार्च रोजी एक अध्यादेश जारी केला होता. त्यानुसार सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. वन विभागाशिवाय इतर विभागांची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी बैठका घेऊन, सर्वांना अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे. ही संपूर्ण मोहीम अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जात असल्याचेही यावेळी भगत यांनी सांगितले.खासगी संस्थांचा विशेष सहभाग ही मोहीम सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी स्वतंत्र नियोजन करून प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. यातून लोकांना या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. वन विभागाच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळत आहे. अनेक खासगी व स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वनविभाग आणि शासकीय विभागांसह खासगी संस्थांचाही मोठा सहभाग राहणार असल्याचे पीसीसीएफ भगत म्हणाले. तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी १ जुलैच्या दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी वन विभाग पूर्णत: सज्ज झाला आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी २५ जूनपर्यंत आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. शिवाय आता पुढील ३० जूनपर्यंत आॅफलाईन सुविधा सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, दोन कोटी वृृक्ष लागवडीसाठी मागील २५ जूनपर्यंत तब्बल तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी झाली असल्याचे भगत यांनी सांगितले. तसेच राज्यभरात तीन कोटी एक लाख खड्डे खोदून तयार असल्याचेही ते म्हणाले. यात दोन कोटी स्वत: वन विभाग लागवड करणार असून, ५० लाख इतर शासकीय यंत्रणा आणि उर्वरित ५० लाख खासगी व स्वयंसेवी संस्था वृक्ष लागवड करणार आहेत.