शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत नागपूर होणार ग्लोबल सिटी

By admin | Updated: December 28, 2014 00:38 IST

नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल

नागपुरातील एनआरआय समूहाचा पुढाकार : नागपूर फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्टनागपूर : नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केल्याची माहिती समूहाचे प्रमुख शिकागो येथील अनिवासी भारतीय दिनेश जैन यांनी दिली.नागपूर फर्स्ट आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मंचावर खासदार अजय संचेती, आ. आशिष देशमुख, आ. सुनील केदार होते. जैन यांनी सांगितले की, १९८४ मध्ये नागपूर सोडले. या शहराशी आपली बांधिलकी आहे. मातीचे कर्ज चुकविण्याची कल्पना २००६ मध्ये मनात आली. विविध देशातील अनिवासी भारतीयांशी चर्चा केल्यानंतर २००८ मध्ये नागपूरला ग्लोबल सिटी बनविण्याची संकल्पना पुढे आली. विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविताना नागपूर फर्स्टने ५ हजार झाडे लावली आहेत. शिवाय अनेक कामे तडीस नेली आहेत. ग्लोबल समिट दरवर्षी भरविण्यात येणार आहे. नागपूर फर्स्टला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केदार आणि संचेती यांनी दिले. उद्घाटन सत्राचे संचालन संजय अरोरा यांनी केले. शशांक राव, फैज वाहिद आणि निशांत सोमलवार यांनी पाहुण्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. उद्घाटन सत्रानंतर ‘ग्लोबल शहरासाठी ग्लोबल स्टॅन्डर्ड’ यावर चर्चा झाली. यावेळी एनआरआय, व्यावसायिक, उद्योजक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी : गडकरीनागपुरात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टायगर प्रकल्प आहेत. जैविक इंधन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. टाकाऊ भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या जैविक इंधनाचे डिझेलमध्ये मिश्रण केल्यास डिझेलचा दर प्रति लिटर १० रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होऊन रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. भारत १०० दशलक्ष डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि एक लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. अनिवासी भारतीयांनी या दोन्ही क्षेत्रात उत्पादन प्रकल्प नागपुरात सुरू करावेत. विदर्भात पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचे गडकरी म्हणाले. वैदर्भीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी मिहान-सेझमध्ये विविध उद्योग सुरू करावे, नागपूरला जैविक फार्मिंग कॅपिटल बनवावे, कॉटन आणि सिल्क टेक्सटाईल इंडस्ट्री, मायनिंग आणि मिनरल ट्रेडिंग, लॉजिस्टिक सेंटर सुरू करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.