शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत नागपूर होणार ग्लोबल सिटी

By admin | Updated: December 28, 2014 00:38 IST

नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल

नागपुरातील एनआरआय समूहाचा पुढाकार : नागपूर फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्टनागपूर : नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केल्याची माहिती समूहाचे प्रमुख शिकागो येथील अनिवासी भारतीय दिनेश जैन यांनी दिली.नागपूर फर्स्ट आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मंचावर खासदार अजय संचेती, आ. आशिष देशमुख, आ. सुनील केदार होते. जैन यांनी सांगितले की, १९८४ मध्ये नागपूर सोडले. या शहराशी आपली बांधिलकी आहे. मातीचे कर्ज चुकविण्याची कल्पना २००६ मध्ये मनात आली. विविध देशातील अनिवासी भारतीयांशी चर्चा केल्यानंतर २००८ मध्ये नागपूरला ग्लोबल सिटी बनविण्याची संकल्पना पुढे आली. विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविताना नागपूर फर्स्टने ५ हजार झाडे लावली आहेत. शिवाय अनेक कामे तडीस नेली आहेत. ग्लोबल समिट दरवर्षी भरविण्यात येणार आहे. नागपूर फर्स्टला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केदार आणि संचेती यांनी दिले. उद्घाटन सत्राचे संचालन संजय अरोरा यांनी केले. शशांक राव, फैज वाहिद आणि निशांत सोमलवार यांनी पाहुण्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. उद्घाटन सत्रानंतर ‘ग्लोबल शहरासाठी ग्लोबल स्टॅन्डर्ड’ यावर चर्चा झाली. यावेळी एनआरआय, व्यावसायिक, उद्योजक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी : गडकरीनागपुरात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टायगर प्रकल्प आहेत. जैविक इंधन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. टाकाऊ भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या जैविक इंधनाचे डिझेलमध्ये मिश्रण केल्यास डिझेलचा दर प्रति लिटर १० रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होऊन रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. भारत १०० दशलक्ष डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि एक लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. अनिवासी भारतीयांनी या दोन्ही क्षेत्रात उत्पादन प्रकल्प नागपुरात सुरू करावेत. विदर्भात पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचे गडकरी म्हणाले. वैदर्भीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी मिहान-सेझमध्ये विविध उद्योग सुरू करावे, नागपूरला जैविक फार्मिंग कॅपिटल बनवावे, कॉटन आणि सिल्क टेक्सटाईल इंडस्ट्री, मायनिंग आणि मिनरल ट्रेडिंग, लॉजिस्टिक सेंटर सुरू करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.