शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: February 24, 2016 03:22 IST

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही.

निरंजन डावखरे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विभागीय कार्यालयावर मोर्चानागपूर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही. दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठोस व भरीव मदत करण्यासाठी शासनाने येत्या बजेट अधिवेशनात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केली. अन्यथा राज्यभर आक्रमक आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, नुकसानग्रस्त सोयाबीन, कापुस, धान व संत्रा पिकाला भरपाई देण्यात यावी, एपीएल कार्डवरील धान्य त्वरीत सुरू करावे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुरू कराव्या, नागपूर शहरातील झोपडपट्टी धारकांना मालकीचे पट्टे देण्यात यावे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय मोर्चाचे आयोजन मंगळवारी प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या मोर्चात आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, पंकज बोराडे, शैलेश मोहिते, आशिष नाईक, विलास झोडापे, संदीप कीटे, मुनाफ शेख, रिंकु पापडकर, किशोर तरोणे, नगरसेवक राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, ईश्वर बाळबुधे, विशाल खांडेकर, वर्षा शामकुळे, रिजवान अन्सारी, रविकांत वरपे, राजेंद्र बढिये, साहिल सय्यद यांच्यासह नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधान चौकात छोटेखानी सभा पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सभेत आ. प्रकाश गजभिये यांनी सरकारवर ताशेरे ओढत हे सरकार विकासाच्या नावावर शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला. प्रवक्ता अतुल लोंढे यांनी हे सरकार उद्योगपतींना तारणारे आणि शेतकऱ्यांना मारणारे असल्याचा आरोप केला. गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कापूस व धानाला भाव मिळालाच पाहिज, रोजगाराची संधी, संत्र्याला भाव या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मोर्चा दरम्यान केल्या. मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने विभागीय उपायुक्त अप्पासाहेब धुळास यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.