शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: March 21, 2016 02:58 IST

केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना संविधानाशी काही देणेघेणे नाही.

नागपूर : केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना संविधानाशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. अशा शक्तिविरोधात लढण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी स्वीकारले आहे. या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी कार्यक र्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या जयंती वर्षाचा समारोप ११ एप्रिलला नागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे जाहीर सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी राणी कोठी येथे आयोजित विदर्भातील कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्र्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकु ल वासनिक , माजी खासदार विलास मुत्तेमवार,विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, विधानसभेतील पक्षाचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नतीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक ,आमदार सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमर राजूरकर, हरिभाऊ राठोड, यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रमख पदाधिकारी उपस्थित होते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने विधानभवनावर काढलेल्या मोर्चाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ११ एप्रिलचाही कार्यक्रम असाच भव्य होणार आहे. यात देशभरातील काँग्रेसचे नेते सहभागी होतील. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख योगदान आहे. ११ एप्रिलचा कार्यक्रमही मोर्चाप्रमाणे यशस्वी होईल असा विश्वास मुकूल वासनिक यांनी व्यक्त केला . प्रा्रस्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी तर आभार नितीन राऊ त यांनी मानले. जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) च्या अध्यक्ष सुनीता गावंडे, विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)सोनिया व राहुल गांधी सभेला मार्गदर्शन करणार जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना निमंत्रित केले आहे. ११ एप्रिलच्या कस्तूरचंद पार्क येथील जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी दीक्षाभूमीला भेट देऊ न अभिवादन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.