शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अवयवदानानंतरही जगू शकतो सामान्य जीवन

By admin | Updated: August 13, 2016 02:30 IST

किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते.

ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर जुही पवारचा विश्वास : युवकांना पुढे येण्याचे आवाहन नागपूर : किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते. मात्र ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. अवयवदान करणारी व्यक्ती वजन उचलण्यापासून जलतरण करण्यापर्यंत कोणतेही कार्य अगदी सहज आणि सामान्य लोकांप्रमाणे करू शकते हा विश्वास वडिलांना आपले यकृत दान करणारी आणि आता अवयवदानाची राज्य शासनाची ब्रँड अ‍ॅम्बेसडर जुही पवार हिने दिला. मूळची जळगावची जुही सध्या मुंबईच्या सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. मात्र तिची ओळख तिने केलेल्या अद्वितीय कार्यामुळे आहे. वडिलांचा यकृताचा आजार बळावला तेव्हा ती अवघ्या १९ वर्षाची होती व वैद्यकीय महाविद्यालयात नुकताच प्रवेश केला होता. मात्र वडिलांचा त्रास पाहून तिने मोठा निर्णय घेतला. स्वत:च्या यकृताचा भाग वडिलांना देण्याचा. वडिलांसह अनेकांनी तसे करण्यास तिला मनाई केली. मात्र डॉक्टरांशी चर्चा करून तिने यकृताचा ७० टक्के भाग वडिलांना दिला. तिच्या साहसाची दखल घेत सरकारने मागील वर्षी अवयव दानाची अग्रदूत म्हणून निवड केली. अवयदानाच्या जनजागृतजीसाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी नागपूरला आलेल्या जुहीने ‘लोकमत’शी बोलताना अवयव दानाबाबत आपले मत व्यक्त केले. भारतात दोन लाख किडनी आणि जवळपास एक लाख यकृताची आवश्यकता आहे. मात्र अवयवदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. क्रोएशिया, स्पेनसारख्या देशांमध्ये अवयव दान करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. देशात १० लाखांमधून एक व्यक्ती जरी अवयवदानासाठी पुढे आली तर सर्वांची गरज पूर्ण होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तामिळनाडू आणि इतर दक्षिणात्य राज्यात अवयदानाबाबत आनंददायक वातावरण असल्याचे तिन सांगितले.(प्रतिनिधी) अवयवदानावर जनजागृती रॅली आज डॉ. रवी वानखेडे म्हणाले, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त झोनल ट्रान्सप्लॅन्ट कोआॅर्डिनेशन सेंटर, मोहन फाऊंडेशन नागपूर केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १३ आॅगस्ट रोजी अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुही पवार या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता बजाजनगर येथील मातृ सेवा संघाच्या प्रांगणातून अवयवदान जनजागृती पदयात्रा रॅलीला सुरुवात करण्यात येईल. महापौर प्रवीण दटके हिरवी झेंडी दाखवतील. एलएडी महाविद्यालयात रॅलीचे समापन होईल. पत्रपरिषदेला निवृत्त एसीपी चंद्रकांत उद््गीकर, चारुलता बावनकुळे, डॉ. डी.जी. वाघमारे, मातृ सेवा संघाचे डॉ. जॉन मेनॉचरी, विद्यापीठाचे एनएसएसचे समन्यवयक डॉ. भाऊ दायदार प्रामुख्याने उपस्थित होते.