शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत ठरणार सरपंचाचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आणि ताे विशेष सभेत सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. कृष्णा उईके यांनी सरपंचपदी थेट मतदारांमधून निवड करण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये साेमवारी (दि. २२) विशेष ग्रामसभा बाेलावली आहे. या ग्रामसभेत या ठरावावर मतदान घेतले जाणार असून, त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डी. जी. जाधव यांनी दिली.

सरपंच कृष्णा उईके व ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत उपसरपंचासह इतर सदस्यांनी त्यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर निर्णय घेण्यासाठी ९ फेब्रुवारी राेजी आयाेजित केलेल्या विशेष सभेत हा ठराव सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. या सभेला उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीता काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर उपस्थित होते. सरपंच उईके यांची निवड थेट मतदारांमधून करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर विशेष ग्रामसभेत मतदान करून निर्णय घेण्यात येणार आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्याने साेमवारी विशेष नारसिंगी येथे विशेष ग्रामसभेचे आयाेजन केले आहे. प्रशासनाने ही विशेष ग्रामसभा घेण्याची घाई केली, असा आराेप काही नागरिकांनी केला आहे.

...

काेराेना काळात मतदान

सध्या काेराेना संक्रमण वाढत आहेे. त्यातच सरपंचाच्या भवितव्यासाठी विशेष ग्रामसभा व त्यात मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, काेराेनामुळे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यात आल्या हाेत्या. ग्रामसभेत हाेणारी नागरिकांची गर्दी काेरानाच्या पथ्यावर पडू शकते, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली असून, केवळ राजकीय दबावामुळे या काळात मतदान घेण्यात येत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे काही ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे दाेन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर अद्याप निवडा देण्यात आला नाही, असे कृष्णा उईके यांनी सांगितले. तर, ही ग्रामसभा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार बाेलावली असल्याचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले.