शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

ग्रामसभेत ठरणार सरपंचाचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आणि ताे विशेष सभेत सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. कृष्णा उईके यांनी सरपंचपदी थेट मतदारांमधून निवड करण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये साेमवारी (दि. २२) विशेष ग्रामसभा बाेलावली आहे. या ग्रामसभेत या ठरावावर मतदान घेतले जाणार असून, त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डी. जी. जाधव यांनी दिली.

सरपंच कृष्णा उईके व ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत उपसरपंचासह इतर सदस्यांनी त्यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर निर्णय घेण्यासाठी ९ फेब्रुवारी राेजी आयाेजित केलेल्या विशेष सभेत हा ठराव सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. या सभेला उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीता काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर उपस्थित होते. सरपंच उईके यांची निवड थेट मतदारांमधून करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर विशेष ग्रामसभेत मतदान करून निर्णय घेण्यात येणार आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्याने साेमवारी विशेष नारसिंगी येथे विशेष ग्रामसभेचे आयाेजन केले आहे. प्रशासनाने ही विशेष ग्रामसभा घेण्याची घाई केली, असा आराेप काही नागरिकांनी केला आहे.

...

काेराेना काळात मतदान

सध्या काेराेना संक्रमण वाढत आहेे. त्यातच सरपंचाच्या भवितव्यासाठी विशेष ग्रामसभा व त्यात मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, काेराेनामुळे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यात आल्या हाेत्या. ग्रामसभेत हाेणारी नागरिकांची गर्दी काेरानाच्या पथ्यावर पडू शकते, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली असून, केवळ राजकीय दबावामुळे या काळात मतदान घेण्यात येत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे काही ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे दाेन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर अद्याप निवडा देण्यात आला नाही, असे कृष्णा उईके यांनी सांगितले. तर, ही ग्रामसभा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार बाेलावली असल्याचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले.