शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

ज्यांना संपवले, त्यांच्या सोबतच अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्यांना अत्यंत निर्दयपणे संपवले त्या पत्नी-मुलांसोबतच क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातूरकर (वय ४५) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्यांना अत्यंत निर्दयपणे संपवले त्या पत्नी-मुलांसोबतच क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातूरकर (वय ४५) याच्यावरही त्याच्या कुटुंबीयांनी एकत्र अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे आलोकच्या क्राैर्याला बळी पडलेल्या लक्ष्मीबाई देवीदास बोबडे (आरोपीची सासू) आणि अमिषा (मेहुणी) या दोघींवर देवीदास बोबडे आणि त्यांच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.

विजया आलोक मातूरकर (वय ४०), परी (१५) आणि साहिल (१२) तसेच लक्ष्मीबाई (५५) आणि अमिषा (२१) या पाचजणांची हत्या करून आरोपी आलोकने आत्महत्या केली. उपराजधानी सुन्न करणाऱ्या या हत्याकांडाची माहिती सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघड झाली. या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त लोहित मतानी, उपायुक्त सारंग आवाड, ठाणेदार जयेश भांडारकर आणि त्यांचे सहकारी ३६ तासांपासून सलग प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी मृतांचे नातलग, मित्र, शेजारी यांचे बयाण नोंदवले. मंगळवारी पुन्हा दोन्ही घरांतील साहित्य तपासणी केली. मृत तसेच आरोपींचे मोबाईल, त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे आणि इतर काही वस्तू जप्त केल्या. आरोपी आलोकच्या अमरावती येथील घराशी संबंधित कर्जाची (बँकेची) फाईल आणि चिठ्ठ्याही पोलिसांनी जप्त केल्या. शवविच्छेदन आटोपल्यानंतर विजया, परी, साहिल आणि मृत आरोपी आलोक अशा चाैघांचे मृतदेह आलोकचे भाऊ विवेक मातूरकर यांनी ताब्यात घेतले. विवेक आणि त्यांचे भाऊ, बहिणी शांतिनगरात राहतात. त्यांनी या चाैघांवर अंत्यसंस्कार केले. तर, पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगी अमिषाचा मृतदेह ताब्यात घेऊन देवीदास बोबडे आणि नातेवाइकांनी मायलेकींवर अंत्यसंस्कार केले.

---

ती लग्नातून परतली होती

सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यासोबत (आरोपी आलोक) अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या अमिषाच्या ‘सैराट’पणामुळे हे अमानुष हत्याकांड घडल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी दुपारी आपल्या मित्र-मैत्रिणीसह शॉपिंग करत फिरणारी अमिषा रात्री एका लग्नात गेली होती. तिकडून ती ‘वेगळी जागा शोधण्याचा निर्णय’ घेऊन घरी परतली होती. काही वेळानंतर आलोक काळ बनून तिच्या घरात येईल, अशी तिला कल्पनाही नव्हती.

---

अंडी, मटन अन् आरोपी

गेल्या वर्षीपर्यंत परिश्रमपूर्वक संसार उभा करणारा आरोपी आलोक अमिषासाठी वेडापिसाच झाला होता. त्याने कामधंदाही बंद केला होता. आळशीपणामुळे त्याने घरमालकाचे भाडे अन् विजेचे बिलही थकविले होते. तो कधीही मटन, चिकन खात नव्हता. केवळ अंडी खायचा. रविवारी मात्र त्याने घरात मटन आणले अन् सर्वांसोबत त्याने ते खाल्ले. खाण्यापिण्यातून त्याने कुटुंबीयांना काही विषाक्त अथवा गुंगीचे पदार्थ दिले की काय, अशी शंका आहे.

---