शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

संत्रा उत्पादकांपुढे फळगळतीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:10 IST

नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह ...

नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, मोर्शी आणि परतवाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्राबागांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या चमूने अलीकडेच नागपूर जिल्ह्यासह चांदूर बाजार आणि परतवाडा भागात होणाऱ्या संत्रा फळगळीचा आढावा घेतला. चांदूर बाजार तालुक्यातील नानोरी, वणी, माधान, काजळी, जासापूर आणि पिंब्री तसेच परतवाडा तालुक्यातील सावली, दतुरा, एकलासपूर आणि तोंडगाव व मोर्शी तालुका फळगळीने सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र असल्याचे या पाहणीतून पुढे आले. जुलै ते ऑगस्ट या काळात शेतकऱ्यांचे सुमारे १० ते ४० टक्के नुकसान झाल्याचे या पाहणीत पुढे आले आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील मृदा विज्ञान विभागाचे डॉ. ए. के. श्रीवास्तव आणि फलोत्पादन विभागाचे डॉ. ए. डी. हुच्चे यांच्या नेतृत्वात दोन चमूंनी शेतकऱ्यांच्या संत्राबागांवर जाऊन निरीक्षणे नोंदविली. या चमूने फळगळीच्या समस्येचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि उपाययोजना सुचविल्या. व्यवस्थापन हे यातील कारण असल्याचे मत चमूतील सदस्यांनी नोंदविले.