शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर ! - अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य : पुनर्वापर झालेले ...

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर ! - अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य : पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. आपल्याकडे अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. पण, एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते. वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असताना हॉटेलमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणा-यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या तेलामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तेलाचा पुनर्वापर न करता बाझो-डिझेलची निर्मिती करणा-या कंपनीला विकावे, असा नियम असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. हॉटेलपेक्षा हातठेल्यावर खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे अनेकजण उघड्यावर समोसे, कचोरी आणि इतर पदार्थ आवडीने खातात. या ठिकाणी तेलाचा अनेकदा पुनर्वापर केला जातो. तेलाचा पुनर्वापर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. नियमानुसार करता येत नाही, पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे फावते. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार वापर केला जातो. अशा तेलातून तळलेल्या पदार्थांमुळे अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एकदा वापरून झालेले तेल पुन:पुन्हा वापरल्याने ॲथेरोस्कॉलरोसिस होऊ शकतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे तयार होणा-या फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय बॅड कोलेस्ट्रॉल तयार होऊन हृदयघातही होऊ शकतो. स्मोकिंग पॉइंट कमी असलेल्या तेलाचा वापर तळणासाठी करावा. रस्त्यावर न खाल्लेलेच बरे. फुटपाथवरील हातठेल्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर करून अन्नपदार्थ तळले जातात. या पदार्थांची किंमत हॉटेलपेक्षा कमी असल्याने लोकांची गर्दी असते. अनेकजण पदार्थ खरेदी करून घरी नेतात आणि लहान मुलांना देतात. त्यामुळे शारीरिक व्याधीचा धोका जास्तच वाढतो. हे पदार्थ आजाराला आमंत्रण देतात. या ठिकाणी तेलाचा पुनर्वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे शक्यतो हातठेल्यावर तळलेले पदार्थ लोकांनी टाळायला हवे. ... तर होईल गुन्हा दाखल तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरतो. अन्न प्रशासन विभागाकडे नोंदणी हॉटेल व रेस्टॉरंटने तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये. अधिका-यांना आढळून आल्यास कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. जयंत वाणे, सहआयुक्त (प्रभारी) (अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग, तेलाचा पुनर्वापर आजाराला आमंत्रण हॉटेल आणि घरी तळलेल्या तेलाचा पुनर्वापर करू नये. तेलाचा पुनर्वापर गंभीर आजाराला आमंत्रण देणारे ठरते. या तेलामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. धमन्या ब्लॉक होतात. त्यामुळे हृदयघात होऊ शकतो. शिवाय, अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. डॉ. प्रसाद वर्दळकर. विभागाच्या १७ कारवाया तेलाचा पुनर्वापर करणाºया १७ जणांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत कारवाई केली आहे. या संदर्भात हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातठेल्यावर खाद्यपदार्थ विकणा-यांवर नियमित कारवाई केली जाते. अनेकांकडून दंड तर काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढेही कारवाई करणार असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.