शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे

जॉब कार्ड निकामी : ‘बिहारी पॅटर्न’ वृक्ष लागवड योजना ठरली डोकेदुखीराम वाघमारे - नांदग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे दाम’ अशी घोषणाही करण्यात आली. मात्र, भिवापूर तालुक्यातील आलेसूर येथे या महत्त्वपूर्ण योजनेचा फज्जा उडाला आहे. भिवापूर तालुक्यातील आलेसूर या गटग्रामपंचायतअंतर्गत आलेसूर, वणी, खोलदोडा आणि खापरी या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यातील आलेसूर या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे. या लोकसंख्येपैकी अंदाजे ७० टक्के ग्रामस्थ मजुरी करून कुटुंबीयांची उपजीविका करतात. दरम्यान, केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खासकरून ग्रामीण भागात राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबातील १८ वर्षावरील व्यक्तीला हक्काचे काम देण्याची तसेच त्या कामाचा योग्य मोबदला देण्याची घोषणा शासनाने केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे मजुरांची नोंदणी करून बहुतांश मजुरांना ‘जॉब कार्ड’चे वाटप करण्यात आले. स्थानिक ‘जॉब कार्ड’धारक मजुरांना किमान १०० दिवस काम देणे व त्या कामाचा शासनाने ठरविलेला मोबदला प्रदान करणे आवश्यक आहे. यात काही मजुरांना काम तर देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून १०० दिवस काम करवून न घेता मध्ये कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांच्याजागी दुसऱ्यांना काम देण्यात आले. बहुतेक मजुरांचे ‘जॉब कार्ड’ वर्षभरापासून कोरे असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यांच्या ‘जॉब कार्ड’ वर कुठल्याही कामाची नोंद या काळात करण्यात आली नाही. रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेंतर्गत रोजगार मिळत नसल्याने सदर ‘जॉब कार्ड’ निकामी ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे आॅगस्ट २०१३ मध्ये ‘बिहारी पॅटर्न’ ही वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. सदर काम करण्यासाठी निवडण्यात आलेल्या चार मजुरांचा एक गट याप्रमाणे काही गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटातील प्रत्येक मजुराला तीन वर्षांपर्यत १०० दिवस काम द्यावयाचे होते. या योजनेत काम करणाऱ्या बहुतांश मजुरांना १०० दिवस पूर्ण होण्याआधीच कामावरून कमी करण्यात आले. त्या मजुरांच्या जागी नवीन मजुरांचे गट तयार करून त्यांना कामावर नियुक्त करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या जुन्या व नवीन गटामध्ये आपसी मतभेद व्हायला सुरुवात झाली. पुढे या मतभेदामुळे तणावही निर्माण झाला. ‘बिहारी पॅटर्न’ या योजनेंतर्गत आपल्याला किमान १०० दिवस काम उपलब्ध करून द्यावे, सदर कालावधी पूर्ण होईपर्यंत दुसऱ्यांना कामावर नियुक्त करू नये, अशी मागणी कष्टकरी जन आंदोलन समितीचे एकनाथ गजभिये, शेषराव गायकवाड, प्रवीण राजनहिरे, राजकुमार मेश्राम, अंबादास राहुल, बापूराव गायकवाड आदींनी केली आहे.