शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे

जॉब कार्ड निकामी : ‘बिहारी पॅटर्न’ वृक्ष लागवड योजना ठरली डोकेदुखीराम वाघमारे - नांदग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे दाम’ अशी घोषणाही करण्यात आली. मात्र, भिवापूर तालुक्यातील आलेसूर येथे या महत्त्वपूर्ण योजनेचा फज्जा उडाला आहे. भिवापूर तालुक्यातील आलेसूर या गटग्रामपंचायतअंतर्गत आलेसूर, वणी, खोलदोडा आणि खापरी या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यातील आलेसूर या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे. या लोकसंख्येपैकी अंदाजे ७० टक्के ग्रामस्थ मजुरी करून कुटुंबीयांची उपजीविका करतात. दरम्यान, केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खासकरून ग्रामीण भागात राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबातील १८ वर्षावरील व्यक्तीला हक्काचे काम देण्याची तसेच त्या कामाचा योग्य मोबदला देण्याची घोषणा शासनाने केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे मजुरांची नोंदणी करून बहुतांश मजुरांना ‘जॉब कार्ड’चे वाटप करण्यात आले. स्थानिक ‘जॉब कार्ड’धारक मजुरांना किमान १०० दिवस काम देणे व त्या कामाचा शासनाने ठरविलेला मोबदला प्रदान करणे आवश्यक आहे. यात काही मजुरांना काम तर देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून १०० दिवस काम करवून न घेता मध्ये कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांच्याजागी दुसऱ्यांना काम देण्यात आले. बहुतेक मजुरांचे ‘जॉब कार्ड’ वर्षभरापासून कोरे असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यांच्या ‘जॉब कार्ड’ वर कुठल्याही कामाची नोंद या काळात करण्यात आली नाही. रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेंतर्गत रोजगार मिळत नसल्याने सदर ‘जॉब कार्ड’ निकामी ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे आॅगस्ट २०१३ मध्ये ‘बिहारी पॅटर्न’ ही वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. सदर काम करण्यासाठी निवडण्यात आलेल्या चार मजुरांचा एक गट याप्रमाणे काही गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटातील प्रत्येक मजुराला तीन वर्षांपर्यत १०० दिवस काम द्यावयाचे होते. या योजनेत काम करणाऱ्या बहुतांश मजुरांना १०० दिवस पूर्ण होण्याआधीच कामावरून कमी करण्यात आले. त्या मजुरांच्या जागी नवीन मजुरांचे गट तयार करून त्यांना कामावर नियुक्त करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या जुन्या व नवीन गटामध्ये आपसी मतभेद व्हायला सुरुवात झाली. पुढे या मतभेदामुळे तणावही निर्माण झाला. ‘बिहारी पॅटर्न’ या योजनेंतर्गत आपल्याला किमान १०० दिवस काम उपलब्ध करून द्यावे, सदर कालावधी पूर्ण होईपर्यंत दुसऱ्यांना कामावर नियुक्त करू नये, अशी मागणी कष्टकरी जन आंदोलन समितीचे एकनाथ गजभिये, शेषराव गायकवाड, प्रवीण राजनहिरे, राजकुमार मेश्राम, अंबादास राहुल, बापूराव गायकवाड आदींनी केली आहे.