शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे

जॉब कार्ड निकामी : ‘बिहारी पॅटर्न’ वृक्ष लागवड योजना ठरली डोकेदुखीराम वाघमारे - नांदग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे दाम’ अशी घोषणाही करण्यात आली. मात्र, भिवापूर तालुक्यातील आलेसूर येथे या महत्त्वपूर्ण योजनेचा फज्जा उडाला आहे. भिवापूर तालुक्यातील आलेसूर या गटग्रामपंचायतअंतर्गत आलेसूर, वणी, खोलदोडा आणि खापरी या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यातील आलेसूर या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे. या लोकसंख्येपैकी अंदाजे ७० टक्के ग्रामस्थ मजुरी करून कुटुंबीयांची उपजीविका करतात. दरम्यान, केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खासकरून ग्रामीण भागात राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबातील १८ वर्षावरील व्यक्तीला हक्काचे काम देण्याची तसेच त्या कामाचा योग्य मोबदला देण्याची घोषणा शासनाने केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे मजुरांची नोंदणी करून बहुतांश मजुरांना ‘जॉब कार्ड’चे वाटप करण्यात आले. स्थानिक ‘जॉब कार्ड’धारक मजुरांना किमान १०० दिवस काम देणे व त्या कामाचा शासनाने ठरविलेला मोबदला प्रदान करणे आवश्यक आहे. यात काही मजुरांना काम तर देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून १०० दिवस काम करवून न घेता मध्ये कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांच्याजागी दुसऱ्यांना काम देण्यात आले. बहुतेक मजुरांचे ‘जॉब कार्ड’ वर्षभरापासून कोरे असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यांच्या ‘जॉब कार्ड’ वर कुठल्याही कामाची नोंद या काळात करण्यात आली नाही. रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेंतर्गत रोजगार मिळत नसल्याने सदर ‘जॉब कार्ड’ निकामी ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या योजनेंतर्गत आलेसूर येथे आॅगस्ट २०१३ मध्ये ‘बिहारी पॅटर्न’ ही वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. सदर काम करण्यासाठी निवडण्यात आलेल्या चार मजुरांचा एक गट याप्रमाणे काही गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटातील प्रत्येक मजुराला तीन वर्षांपर्यत १०० दिवस काम द्यावयाचे होते. या योजनेत काम करणाऱ्या बहुतांश मजुरांना १०० दिवस पूर्ण होण्याआधीच कामावरून कमी करण्यात आले. त्या मजुरांच्या जागी नवीन मजुरांचे गट तयार करून त्यांना कामावर नियुक्त करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या जुन्या व नवीन गटामध्ये आपसी मतभेद व्हायला सुरुवात झाली. पुढे या मतभेदामुळे तणावही निर्माण झाला. ‘बिहारी पॅटर्न’ या योजनेंतर्गत आपल्याला किमान १०० दिवस काम उपलब्ध करून द्यावे, सदर कालावधी पूर्ण होईपर्यंत दुसऱ्यांना कामावर नियुक्त करू नये, अशी मागणी कष्टकरी जन आंदोलन समितीचे एकनाथ गजभिये, शेषराव गायकवाड, प्रवीण राजनहिरे, राजकुमार मेश्राम, अंबादास राहुल, बापूराव गायकवाड आदींनी केली आहे.