शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं ऐक्यासाठी समिती स्थापन व्हावी

By admin | Updated: April 13, 2015 02:24 IST

एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ

नागपूर : एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. त्यात ऐक्यासंबंधीचा आराखडा तयार करावा, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी रविवार येथे व्यक्त केले. रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आठवले यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यावर टीका केली. एका धर्माचा आदर करीत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. गोवंशमुळे हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे या कायद्यातून ‘वंश’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. १९७६ पासून हा कायदा आहे. परंतु युती शासनकाळात गोवंश हत्या बंदीचा कायदा तयार करण्यात आला होता. तो कायदा सध्या मंजूर करण्यात आला आहे. गोवंश मुळे भाकड बैलांची कत्तल करणे हासुद्धा गुन्हा ठरणार आहे. भाकड बैलांना पाळणे हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. तसेच त्याच्या मांस विक्री व चामड्यांचा उद्योगांचे मोठे अर्थशास्त्र आहे. लाखो लोक बेरोजगार होणार आहे. यासंबंधात आरपीआयतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून या कायद्यातील वंश शब्द काढण्याची मागणी करण्यात येईल. केंद्रातील भूसंपादनाच्या कायद्यात ७० टक्के सहमतीची अट कायम ठेवण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना शेत मजुरांचाही विचार करावा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आरपीआयचा पूर्वीपासूनच विरोध आहे. या विषयावर आम्ही शिवसेनेसोबत आहोत. तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही भाजपसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आरपीआयतर्फे २० मे रोजी यवतमाळ येथे आदिवासी हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता महायुती पाच वर्षांचा कार्यकाळ पूण करेल असा दावा त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)