शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

रिपाइं ऐक्यासाठी समिती स्थापन व्हावी

By admin | Updated: April 13, 2015 02:24 IST

एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ

नागपूर : एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. त्यात ऐक्यासंबंधीचा आराखडा तयार करावा, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी रविवार येथे व्यक्त केले. रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आठवले यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यावर टीका केली. एका धर्माचा आदर करीत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. गोवंशमुळे हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे या कायद्यातून ‘वंश’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. १९७६ पासून हा कायदा आहे. परंतु युती शासनकाळात गोवंश हत्या बंदीचा कायदा तयार करण्यात आला होता. तो कायदा सध्या मंजूर करण्यात आला आहे. गोवंश मुळे भाकड बैलांची कत्तल करणे हासुद्धा गुन्हा ठरणार आहे. भाकड बैलांना पाळणे हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. तसेच त्याच्या मांस विक्री व चामड्यांचा उद्योगांचे मोठे अर्थशास्त्र आहे. लाखो लोक बेरोजगार होणार आहे. यासंबंधात आरपीआयतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून या कायद्यातील वंश शब्द काढण्याची मागणी करण्यात येईल. केंद्रातील भूसंपादनाच्या कायद्यात ७० टक्के सहमतीची अट कायम ठेवण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना शेत मजुरांचाही विचार करावा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आरपीआयचा पूर्वीपासूनच विरोध आहे. या विषयावर आम्ही शिवसेनेसोबत आहोत. तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही भाजपसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आरपीआयतर्फे २० मे रोजी यवतमाळ येथे आदिवासी हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता महायुती पाच वर्षांचा कार्यकाळ पूण करेल असा दावा त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)