शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

रिपाइं ऐक्यासाठी समिती स्थापन व्हावी

By admin | Updated: April 13, 2015 02:24 IST

एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ

नागपूर : एखाद्या कार्यक्रमासाठी रिपाइं नेते एकत्र आल्याने रिपाइंचे ऐक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व सुज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. त्यात ऐक्यासंबंधीचा आराखडा तयार करावा, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी रविवार येथे व्यक्त केले. रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आठवले यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यावर टीका केली. एका धर्माचा आदर करीत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. गोवंशमुळे हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे या कायद्यातून ‘वंश’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. १९७६ पासून हा कायदा आहे. परंतु युती शासनकाळात गोवंश हत्या बंदीचा कायदा तयार करण्यात आला होता. तो कायदा सध्या मंजूर करण्यात आला आहे. गोवंश मुळे भाकड बैलांची कत्तल करणे हासुद्धा गुन्हा ठरणार आहे. भाकड बैलांना पाळणे हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. तसेच त्याच्या मांस विक्री व चामड्यांचा उद्योगांचे मोठे अर्थशास्त्र आहे. लाखो लोक बेरोजगार होणार आहे. यासंबंधात आरपीआयतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून या कायद्यातील वंश शब्द काढण्याची मागणी करण्यात येईल. केंद्रातील भूसंपादनाच्या कायद्यात ७० टक्के सहमतीची अट कायम ठेवण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना शेत मजुरांचाही विचार करावा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आरपीआयचा पूर्वीपासूनच विरोध आहे. या विषयावर आम्ही शिवसेनेसोबत आहोत. तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही भाजपसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आरपीआयतर्फे २० मे रोजी यवतमाळ येथे आदिवासी हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता महायुती पाच वर्षांचा कार्यकाळ पूण करेल असा दावा त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)