शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सहा हजारावर पूरग्रस्तांना खावटी वाटप

By admin | Updated: August 23, 2015 03:12 IST

शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे.

खावटी वाटपास सुरुवात : आतापर्यंत ५.३ कोटी रुपयाचे वाटपनागपूर : शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६ हजार ३४२ कुटुंबीयांना ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी वाटप करण्यात आली आहे. गेल्या १३ आॅगस्ट रोजी नागपूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणावर जनतेचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानाचा सर्वे तातडीने करण्याचा निर्देश देत आपाद्ग्रस्तांसाठी खावटी मंजूर केली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे पंचनामे तयार करून खावटी वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १९ हजार ९४३ कुटुंबीयांना (१ लाख ३० हजार ६१२ व्यक्ती) १४ कोटी ८४ लाख रुपयांची मंजूर खावटीची रक्कम वाटप करावयाची आहे. यामध्ये नागपूर शहरातील सर्वाधिक १५,८९६ कुटुंबीयांना ११ कोटी ९१ लाख रुपये, कामठी येथील १३९६ कुटुंबाला ७०.३४ लाख रुपये, पारशिवनी येथील ९८६ कुटुंबाला ७५.०१ लाख रुपये, नागपूर ग्रामीणमधील ६२४ कुटुंबाला ४४.९८ लाख रुपये, सावनेर तालुक्यातील ६८० कुटुंबाला ५०.७३ लाख रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २३३ कुटुंबाला १४.३९ लाख रुपये, मौदा येथील ४४ कुटुंबाला ३०.५८ लाख रुपये, उमरेड तालुक्यातील ६९ कुटुंबाला ०६.०१ लाख रुपये, रामटेक तालुक्यातील १५ कुटुंबाला १ लाख ३ हजार रुपये खावटी वाटप करावयाची आहे. यापैकी ६३४२ कुटुंबाला ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी आतापर्यंत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांना पुढील आठवड्यापर्यंत खावटीची रक्कम वितरित केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)