शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

खासगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांचा फज्जा; ना मास्क, ना सॅनिटायझर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:06 IST

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन आणि जिल्हा बंदी असल्याने बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स मार्च महिन्याच्या मध्यापासून बंद आहेत. आवश्यक तेवढ्याच ...

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन आणि जिल्हा बंदी असल्याने बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स मार्च महिन्याच्या मध्यापासून बंद आहेत. आवश्यक तेवढ्याच १० टक्के खासगी बसेस रस्त्यावर धावत आहेत. पण प्रवाशांकडे ई-पास नाहीतच. आतापर्यंत कोणत्याही खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई न झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सला रान मोकळे, ना मास्क, ना सॅनिटायझर अशी स्थिती आहे.

लॉकडाऊनपूर्वी नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यात दररोज जवळपास २५० धावत होत्या. जवळपास ५० बस संचालकांतर्फे बसेसचे संचालन करण्यात येते. कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे बसेसमध्ये ५० टक्के प्रवासी संख्येचा नियम आहे. पण जिल्हाबंदी आणि वर्क फ्रॉम होममुळे पुणेसह अन्य जिल्हे वा राज्यातील तरुण नागपुरातूनच काम करीत आहे. त्यांचा प्रवास बंद आहे. शिवाय पुणेसह अन्य जिल्ह्यांतून फार कमी प्रवाशांची ये-जा आहे. अनेकदा प्रवासी कमी मिळत असल्याने बस चालविणे परवडत नाहीत. त्यामुळे बस रद्द करावी लागते. कोरोना लॉकडाऊनमुळे खासगी बसचालकांना तोटा होत आहे. त्यामुळे अनेकांनी बससेवा बंद केल्याचे खुराणा ट्रॅव्हल्सचे राणा खुराणा यांनी सांगितले.

अनेक प्रवासी मास्क वा सॅनिटायझरचा उपयोग करीत नाही. पण बस संचालकांनी बसेसमध्ये सॅनिटायझरचा व्यवस्था केली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या नियमांचे पालन करतात. बसेस फारच कमी धावत असल्याने कोणत्याही बसेसवर आतापर्यंत कारवाई झाली नसल्याचे खुराणा यांनी स्पष्ट केले. प्रवासी फारच कमी असल्याने डिझेलचा खर्चही परवडत नाही. सध्या डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागपूर-पुणे मार्गावर बस चालविणे कठीण आहे. याकरिता ५० टक्के प्रवासी आवश्यक असते. एप्रिल महिन्यात फार कमी संचालकांनी बस पुण्याला नेली. आता राज्य शासनाने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविल्याने बससेवा ठप्प राहणार आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी मिळाल्यास बससेवा सुरू करण्यास हरकत नाही, असे खुराणा म्हणाले.

अशी आहे आकडेवारी :

- रोज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स २० ते २२

- रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स २५ ते ३०

- प्रवाशांची संख्या ६५०

ना मास्क, ना सॅनिटायझर

बैद्यनाथ चौकात खासगी बसेसची पाहणी केली असता अनेक प्रवाशांनी मास्क घातले नव्हते. सीटवर बसल्यानंतर मास्क घालू असे उत्तर मिळाले. काही जणांजवळ सॅनिटायझर नव्हते. सॅनिटायझरची व्यवस्था बसमध्ये होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रवासी बेफिकीर दिसले.

बसेसवर कारवाई नाही

मार्च महिन्याच्या मध्यापासून ९० टक्के बसेस बंद आहेत. सुरू असलेल्या दहा टक्के बसेसमध्ये प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा बस रद्द कराव्या लागतात. अर्थात बसेस धावत नसल्याने कारवाई होत नाही. आतापर्यंत कोणत्याही बसेसवर पोलीस वा आरटीओने कारवाई केलेली नाही.

ई-पास कोणाकडेही नाही

बसेस धावताना ई-पास कुणाकडे आहे, याची तपासणी केली जात नाही. बसेस संचालक ई-पास तपासण्याच्या भानगडीत पडत नाही. जिल्हा बंदी असल्याने प्रवाशाला एकातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज असते. पण ट्रॅव्हल संचालक त्याची तपासणी करीत नसल्याचे दिसून आले.