शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जाम नदीला पूर, पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलालखेडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून बुधवारी रात्री १२ वाजेपासून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जलालखेडा येथून एक किलोमीटर असलेल्या खडकी येथील जाम नदीच्या पुलावरून सुद्धा रात्रीपासून पाणी वाहत होते.

तालुक्यातील मोहगाव भदाडे, गोडीमोहगाव, पांजरा (रिठी) शिवारात पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भदाडे व पिपळा (के.) येथील देवळी नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या शेतात शिरल्याने जवळपास १२५ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, संत्री, मोसंबी पिकांचा समावेश आहे. शेतातील पाइप व शेती उपयोगी वस्तू, गाय, वाहून गेले. तलाठी यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे तयार करून प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. थंडीपवनी शिवारातील तारा, उतारा, सायावडा खलालनगोंदी या परिसरातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

--

वाहतूक सुरळीत

दोन्ही पुलांवरील पाणी गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ओसरले. पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस कर्मचारी त्या भागात तैनात करण्यात आले होते. पाणी कमी झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जाम नदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही पुलांवरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आठ तास वाहतूक खोळंबली होती.

-शेतात कपाशी व तुरीची पेरणी केली असून. मागील ६ ते ७ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी.

सुरेंद्रा रामटेके, शेतकरी, तारा

--

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेंढला सर्कलमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन, संत्री व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.

मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड

090921\img_20210909_081612.jpg

फोटो ओळी 1.  भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी.

फोटो ओळी 2: पुलावरील पाणी ओसरल्या नंतर वाहतूक सुरळीत झालेली वाहतूक.

फोटो ओळी 3. पुलावरून पाणी असल्यामुळे जलालखेडा बस स्थानकात थांबलेल्या बसेस.

फोटो ओळी 4. पुराच्या पाण्यामुळे शेतातील झालेले नुकसान.