शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जाम नदीला पूर, पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलालखेडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून बुधवारी रात्री १२ वाजेपासून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जलालखेडा येथून एक किलोमीटर असलेल्या खडकी येथील जाम नदीच्या पुलावरून सुद्धा रात्रीपासून पाणी वाहत होते.

तालुक्यातील मोहगाव भदाडे, गोडीमोहगाव, पांजरा (रिठी) शिवारात पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भदाडे व पिपळा (के.) येथील देवळी नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या शेतात शिरल्याने जवळपास १२५ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, संत्री, मोसंबी पिकांचा समावेश आहे. शेतातील पाइप व शेती उपयोगी वस्तू, गाय, वाहून गेले. तलाठी यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे तयार करून प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. थंडीपवनी शिवारातील तारा, उतारा, सायावडा खलालनगोंदी या परिसरातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

--

वाहतूक सुरळीत

दोन्ही पुलांवरील पाणी गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ओसरले. पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस कर्मचारी त्या भागात तैनात करण्यात आले होते. पाणी कमी झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जाम नदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही पुलांवरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आठ तास वाहतूक खोळंबली होती.

-शेतात कपाशी व तुरीची पेरणी केली असून. मागील ६ ते ७ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी.

सुरेंद्रा रामटेके, शेतकरी, तारा

--

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेंढला सर्कलमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन, संत्री व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.

मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड

090921\img_20210909_081612.jpg

फोटो ओळी 1.  भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी.

फोटो ओळी 2: पुलावरील पाणी ओसरल्या नंतर वाहतूक सुरळीत झालेली वाहतूक.

फोटो ओळी 3. पुलावरून पाणी असल्यामुळे जलालखेडा बस स्थानकात थांबलेल्या बसेस.

फोटो ओळी 4. पुराच्या पाण्यामुळे शेतातील झालेले नुकसान.