शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

जाम नदीला पूर, पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलालखेडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून बुधवारी रात्री १२ वाजेपासून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जलालखेडा येथून एक किलोमीटर असलेल्या खडकी येथील जाम नदीच्या पुलावरून सुद्धा रात्रीपासून पाणी वाहत होते.

तालुक्यातील मोहगाव भदाडे, गोडीमोहगाव, पांजरा (रिठी) शिवारात पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भदाडे व पिपळा (के.) येथील देवळी नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या शेतात शिरल्याने जवळपास १२५ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, संत्री, मोसंबी पिकांचा समावेश आहे. शेतातील पाइप व शेती उपयोगी वस्तू, गाय, वाहून गेले. तलाठी यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे तयार करून प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. थंडीपवनी शिवारातील तारा, उतारा, सायावडा खलालनगोंदी या परिसरातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

--

वाहतूक सुरळीत

दोन्ही पुलांवरील पाणी गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ओसरले. पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस कर्मचारी त्या भागात तैनात करण्यात आले होते. पाणी कमी झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जाम नदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही पुलांवरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आठ तास वाहतूक खोळंबली होती.

-शेतात कपाशी व तुरीची पेरणी केली असून. मागील ६ ते ७ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी.

सुरेंद्रा रामटेके, शेतकरी, तारा

--

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेंढला सर्कलमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन, संत्री व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.

मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड

090921\img_20210909_081612.jpg

फोटो ओळी 1.  भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी.

फोटो ओळी 2: पुलावरील पाणी ओसरल्या नंतर वाहतूक सुरळीत झालेली वाहतूक.

फोटो ओळी 3. पुलावरून पाणी असल्यामुळे जलालखेडा बस स्थानकात थांबलेल्या बसेस.

फोटो ओळी 4. पुराच्या पाण्यामुळे शेतातील झालेले नुकसान.