शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जाम नदीला पूर, पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलालखेडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून बुधवारी रात्री १२ वाजेपासून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जलालखेडा येथून एक किलोमीटर असलेल्या खडकी येथील जाम नदीच्या पुलावरून सुद्धा रात्रीपासून पाणी वाहत होते.

तालुक्यातील मोहगाव भदाडे, गोडीमोहगाव, पांजरा (रिठी) शिवारात पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भदाडे व पिपळा (के.) येथील देवळी नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या शेतात शिरल्याने जवळपास १२५ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, संत्री, मोसंबी पिकांचा समावेश आहे. शेतातील पाइप व शेती उपयोगी वस्तू, गाय, वाहून गेले. तलाठी यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे तयार करून प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. थंडीपवनी शिवारातील तारा, उतारा, सायावडा खलालनगोंदी या परिसरातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

--

वाहतूक सुरळीत

दोन्ही पुलांवरील पाणी गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ओसरले. पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस कर्मचारी त्या भागात तैनात करण्यात आले होते. पाणी कमी झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जाम नदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही पुलांवरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आठ तास वाहतूक खोळंबली होती.

-शेतात कपाशी व तुरीची पेरणी केली असून. मागील ६ ते ७ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी.

सुरेंद्रा रामटेके, शेतकरी, तारा

--

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेंढला सर्कलमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन, संत्री व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.

मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड

090921\img_20210909_081612.jpg

फोटो ओळी 1.  भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी.

फोटो ओळी 2: पुलावरील पाणी ओसरल्या नंतर वाहतूक सुरळीत झालेली वाहतूक.

फोटो ओळी 3. पुलावरून पाणी असल्यामुळे जलालखेडा बस स्थानकात थांबलेल्या बसेस.

फोटो ओळी 4. पुराच्या पाण्यामुळे शेतातील झालेले नुकसान.