शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विदर्भातील ध्वजारोहण हुबळीच्या ध्वजांनी

By admin | Updated: August 12, 2015 03:55 IST

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरराष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची निर्मिती केली जाते. राष्ट्रध्वजाच्या संहितेनुसार नागपुरात पूर्वी दोन कारागीर ध्वजांची निर्मिती करायचे. या दोघांचाही मृत्यू झाल्याने, नागपुरातील ध्वजनिर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे थेट हुबळीहून ध्वजाची मागणी करावी लागत आहे. गांधीसागर तलावासमोरील खादी ग्रामोद्योग भवन हे ध्वजसंहितेनुसार विक्री करणारे अधिकृत केंद्र आहे. १९६० पासून येथे ध्वजनिर्मिती केले जाते. याला विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथून ध्वजाची मागणी असते. या केंद्रातून स्वातंत्र्यदिनाला जवळपास ५ ते ७ हजार ध्वजांची विक्री होते. नागपुरात भाऊराव पांडे व धापोडकर हे ध्वजनिर्मिती करायचे. अशफाक नावाचे कारागीर ध्वजावरील अशोकचक्र निर्मितीचे काम करायचे. दोन वर्षापूर्वी भाऊराव पांडे यांचे निधन झाले. धापोडकरांचाही मृत्यू झाला. त्यानंतर ध्वजनिर्माते कारागीर तयार न झाल्याने, नागपुरातून ध्वजाची निर्मिती बंद झाली. गेल्या दोन वर्षापासून कर्नाटक येथील हुबळी येथून ध्वजांची मागणी करण्यात येते. स्वातंत्र्य दिनाला नागपुरातील खादी ग्रामोद्योगातून जवळपास १० लाख रुपयांच्या ध्वजांची विक्री होते. काय आहे ध्वजसंहिता ध्वजारोहण सोहळ शासकीय असो की खाजगी, तिथे फडकविला जाणारा ध्वज हा ध्वजसंहितेनुसारच असावा. ध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे खादीचे असावे. ध्वजात केशरी, पांढरा, हिरवा व निळा रंगाचा वापर करण्यात येतो. ध्वजाच्या रंगातही कुठलीही तफावत राहता कामा नये. संहितेनुसार ठराविक आकाराचेच ध्वज असावेत. यात २ बाय ३, ३ बाय ४.५, ४ बाय ६ व ६ बाय ९ हे आकार ध्वजाचे आहेत. ध्वज बनविताना एक इंच आकारसुद्धा वाढता कामा नये. या संहिता पूर्ण झाल्यानंतरच ध्वजाला ‘आयएसआय’ मार्क देण्यात येतो. टायगर हिलवर सर्वात मोठा ध्वजकारगीलच्या युद्धात विजयश्री मिळविल्यानंतर टायगर हिलवर जो राष्ट्रध्वज फडकला तो ८ बाय १२ साईजचा होता. ध्वज संहितेनुसार देशाचा अभिमान वाढविणाऱ्या घटनेप्रसंगीच सर्वात मोठ्या आकाराचा ध्वज फडकविण्यात येतो. जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात फडकविण्यात येणारा ध्वज हा ६ बाय ९ या आकाराचा असतो. इतर सरकारी कार्यालयाला कुठल्या आकाराचा ध्वज घ्यावा याचा नियम नाही.ध्वजनिर्मिती प्रक्रिया संवेदनशीलध्वजनिर्मिती संदर्भात जी संहिता दिलेली आहे त्याच संहितेत निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागपुरातील दोन कारागीरांच्या मृत्यूनंतर, शहरात भरपूर टेलर असताना, कुणालाही निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही. ध्वज खादीशिवाय इतर कुठल्याही कापडाचा बनविता येत नाही. त्याचे रंग, अशोकचक्रातील आरे संहितेनुसारच असावे. ही सर्व प्रक्रिया संवेदनशील असल्यामुळे बाहेर कुणालाही ध्वजनिर्मिती करण्यासाठी देता येत नाही. तुलाराम नेहारे, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भवन, गांधीसागर