शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथे पाकचा ध्वज जाळला

By admin | Updated: April 17, 2017 02:45 IST

कथित हेरगिरीप्रकरणी भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

आज ८६ व्या वर्षांत प्रवेश : पीडित, वंचित उपेक्षितांसाठी दिले अवघे आयुष्य नागपूर : उत्तर प्रदेशातील यमुना किनारी असलेल्या होलीपुरा गावातून एक किशोरवयीन मुलगा नागपूरला निघाला होता पुढच्या शिक्षणासाठी. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा पाणपोईवर वो हिंदू का पाणी, वो मुसलमान का पाणी, असे शब्द त्याने ऐकले आणि ते शब्द त्याच्या काना-मनावर आदळत राहिले एखाद्या ज्वालारसाप्रमाणे. देवाने पाण्याची निर्मिती करताना कुठलाच भेदभाव केला नाही, मग माणसं हा भेद का जपताहेत? नाही... हे चित्र बदलले पाहिजे, असा ध्यास त्याने चालत्या गाडीतच घेतला आणि नागपुरात पाय ठेवल्यावर त्याच दिशेने चालण्याचा संकल्पही करून टाकला. आज त्या अखंड प्रवासाला ८५ वर्षे होत आहेत आणि तेव्हाच्या त्या किशोरवयीन मुलाचे आजचे नाव आहे उमेशबाबू चौबे. पीडित, वंचित उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष पाहिलेले व त्यांच्या विचारांना आपला आदर्श मानणारे बाबूजी अवघे आयुष्य एखाद्या औलियासारखे जगले. पत्रकार, छायाचित्रकार, समाजसेवक, नाटककार, राजकारणी अशा विविध भूमिकांमध्ये नागपूरवासीयांनी बाबूजींना पाहिले असले तरी त्यांची खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची आहे. आॅटोचालक, रिक्षाचालक, रेल्वे हमाल, फुटपाथ दुकानदार, माथाडी कामगार, मिल मजूर यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलनाची मूठ बांधून त्या आंदोलनाच्या बळावर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य बाबूजींनी केले. त्यासाठी प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवले. केवळ कष्टकरी, मजुरांसाठीच संघटना बांधून ते थांबले नाहीत तर विदर्भातील कलावंतांना सन्मानाचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ३० वर्षांआधी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कलासागर या संस्थेची स्थापना केली. तत्कालीन नागपूर विद्यापीठात अधिकृत विद्यार्थी संघटनेचे पहिले अध्यक्ष बनून विद्यार्थ्यांसाठी लढा दिला. नगरसेवक म्हणून मनपात प्रवेश केल्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. धर्मातील दांभिकतेवर बोलताना एका कथित साधूने हल्ला केल्यानंतरही बाबूजी डगमगले नाहीत. उलट त्यांनी अशा भोंदूबाबांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी श्याम मानवांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी आघाडी उघडली. बाबूजींमुळेच नागपूरच्या शंभर शहिदांचे स्मारक झिरो माईलजवळ उभारले गेले. अशा समाजाला विधायक दिशा देणाऱ्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो हीच कामना...(प्रतिनिधी) अन् रस्ताच काढला विकायला बाबूजींची काम करण्याची पद्धत वेगळी होती. या वेगळेपणाचा एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. बाबूजी नगरसेवक असताना एसटी स्टॅण्डपासून सुभाष रोडपर्यंत रस्त्यावर खूप खड्डे होते बाबूजींनी मनपाला पत्र लिहिले. मनपाचे उलट टपाली उत्तर आले की हा रस्ता आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. मग बाबूजींनी नासुप्रला पत्र लिहिले. त्यांचे उत्तर तेच होते. या सरकारी उपेक्षेने संतापलेल्या बाबूजींनी मग आग्याराम देवी चौकात फलक लावला...ज्यावर लिहिले होते ‘सुभाष रोड ते नाग नदीकडे जाणाऱ्या मार्गावरील प्लॉट विकणे आहे’, हे फलक पाहून मनपा हादरली. दुसऱ्याच दिवशी त्यांचा अभियंता बाबूजींच्या घरी आला, माफी मागितली व रस्ता दुरुस्त झाला. असा हा कफल्लक माणूस आजही वयाच्या ८५ व्या वर्षी कार्यकर्त्यांच्या स्कूटरवर बसून निघत असतो नव्या सामाजिक लढाईसाठी. ही लढाई लढताना अशा कुठल्या कामासाठी सरकारदरबारी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण दिले जाते, हे बाबूजींच्या गावीही नसते.