शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरातील उसाच्या पिकाची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या उसाच्या पाचाेळ्याने पेट घेतला. ही आग वेळीच लक्षात न आल्याने तसेच आग विझविण्यास विलंब झाल्याने आठ एकरातील उसाचे पीक जळून राख झाली. ही घटना परसाड (ता. कामठी) शिवारात शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

माधुरी राजेश नरड (४०, रा. परसाड, ता. कामठी) यांची परसाड शिवारात शेती असून, त्यांनी पाच एकरात उसाच्या लागवड केली आहे. पिकाचा दर्जा उत्तम असल्याने चांगले उत्पन्न हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. त्यांच्या शेतातून सावळी-केम शिवाराच्या दिशेने उच्च दाबाची विजेची लाईन गेली आहे. या तारा काही ठिकाणी लाेंबकळलेल्या असून, जाेराच्या हवेमुळे त्या तारांचा एकमेकांना स्पर्श हाेताे.

दरम्यान, शनिवारी दुपारी हवेमुळे या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली. या ठिणगीमुळे ताराखाली असलेल्या कचऱ्यासह उसाच्या पिकाने पेट घेतला. घटनेच्या वेळी शेतात कुणीही नव्हते. काही वेळाने माहिती हाेताच माधुरी नरड यांच्यासह नागरिकांनी शेत गाठले. ताेपर्यंत आगीने राैद्र रूप धारण केले हाेते. ही आग वेळीच विझविणे शक्य न झाल्याने पाचही एकरातील ऊस पूर्णपणे जळाला.

...

आठ लाख रुपयांचे नुकसान

या पाच एकरात किमान आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले असते. संपूर्ण ऊस जळाल्याने आठ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती माधुरी नरड यांनी दिली. शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लाेंबकळलेल्या आहेत. काही ठिकाणी विजेचे खांबही वाकले आहेत. या तारा व खांब सरळ करण्याची तसेच त्यांची याेग्य देखभाल व दुरुस्ती करण्याची महावितरणचे अधिकारी कधीच तसदी घेत नाही. त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने माधुरी नरड यांना आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

खांब वाकले, तारा लाेंबकळल्या

महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन. वैद्य यांनी माहिती मिळताच घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसीलदार अक्षम पोयाम उपस्थित हाेते. त्यांना विजेचे खांब वाकले व तारा लाेंबकळल्या असल्याचे आढळून आले. या तारा कित्येक दिवसापासून लाेंबकळल्या असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.