शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरातील उसाच्या पिकाची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ताराखाली असलेल्या उसाच्या पाचाेळ्याने पेट घेतला. ही आग वेळीच लक्षात न आल्याने तसेच आग विझविण्यास विलंब झाल्याने आठ एकरातील उसाचे पीक जळून राख झाली. ही घटना परसाड (ता. कामठी) शिवारात शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

माधुरी राजेश नरड (४०, रा. परसाड, ता. कामठी) यांची परसाड शिवारात शेती असून, त्यांनी पाच एकरात उसाच्या लागवड केली आहे. पिकाचा दर्जा उत्तम असल्याने चांगले उत्पन्न हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. त्यांच्या शेतातून सावळी-केम शिवाराच्या दिशेने उच्च दाबाची विजेची लाईन गेली आहे. या तारा काही ठिकाणी लाेंबकळलेल्या असून, जाेराच्या हवेमुळे त्या तारांचा एकमेकांना स्पर्श हाेताे.

दरम्यान, शनिवारी दुपारी हवेमुळे या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली. या ठिणगीमुळे ताराखाली असलेल्या कचऱ्यासह उसाच्या पिकाने पेट घेतला. घटनेच्या वेळी शेतात कुणीही नव्हते. काही वेळाने माहिती हाेताच माधुरी नरड यांच्यासह नागरिकांनी शेत गाठले. ताेपर्यंत आगीने राैद्र रूप धारण केले हाेते. ही आग वेळीच विझविणे शक्य न झाल्याने पाचही एकरातील ऊस पूर्णपणे जळाला.

...

आठ लाख रुपयांचे नुकसान

या पाच एकरात किमान आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले असते. संपूर्ण ऊस जळाल्याने आठ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती माधुरी नरड यांनी दिली. शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लाेंबकळलेल्या आहेत. काही ठिकाणी विजेचे खांबही वाकले आहेत. या तारा व खांब सरळ करण्याची तसेच त्यांची याेग्य देखभाल व दुरुस्ती करण्याची महावितरणचे अधिकारी कधीच तसदी घेत नाही. त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने माधुरी नरड यांना आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

खांब वाकले, तारा लाेंबकळल्या

महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन. वैद्य यांनी माहिती मिळताच घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसीलदार अक्षम पोयाम उपस्थित हाेते. त्यांना विजेचे खांब वाकले व तारा लाेंबकळल्या असल्याचे आढळून आले. या तारा कित्येक दिवसापासून लाेंबकळल्या असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.