शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास पेट्रोलने जिवंत जाळणारे पाच आरोपी निर्दोष

By admin | Updated: February 10, 2016 03:31 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे एका तरुणास पेट्रोलने जिवंत जाळून खून करणाऱ्या पाच आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

न्यायालय : पांढराबोडी येथे घडली होती घटनानागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे एका तरुणास पेट्रोलने जिवंत जाळून खून करणाऱ्या पाच आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. राजेश कल्लू मोगरे, असे मृताचे नाव होते. तो पांढराबोडी येथील रहिवासी होता. गुड्डू राजेश कासेकर (२५), लोटन सुदर्शन सकतेल (५५), राजेश ईश्वर कासेकर (४४), अनिल बंसीलाल चव्हाण (३५) आणि लीलाबाई लोटन सकतेल (५०) सर्व रा. पांढराबोडी, अशी आरोपींची नावे आहेत. खुनाची ही घटना ४ डिसेंबर २०१२ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली होती. सरकार पक्षानुसार मृत राजेश मोगरे आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहायचे. त्यांची नेहमीच आपसात भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी मोगरे याचे लोटन सकतेल याच्यासोबत भांडण झाले असता लीलाबाईने चिथावणी दिली. लोटन याने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले होते. राजेश कासेकर आणि अनिल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यानंतर गुड्डू कासेकर याने आगकाडीने त्याला पेटवून दिले होते. मोगरे हा ८९ टक्के जळाला होता. अनिल चव्हाणचे हातही जळाले होते. शेजाऱ्यांनी आग विझवून मोगरे याला उपचारार्थ मेयो इस्पितळात नेले असता दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर २०१२ रोजी त्याला मृत्यू झाला होता. त्याचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवण्यात आले होते. मृताची आई सुधा मोगरे हिच्या तक्रारीवर अंबाझरी पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तपासात बऱ्याच त्रुटी आहेत. मृत्यूपूर्व बयाण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीत तफावती आहेत. प्रत्यक्ष घटना कोणत्या ठिकाणी घडली, याबाबतही संशय आहे. एक आरोपी अनिल चव्हाण याच्या हातावरील जखमांचे व्रण जळाल्याचे नसून त्या जखमा अन्य बाबीने झालेल्या आहेत. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. पराग उके, अ‍ॅड. काझी, अ‍ॅड. चेतन ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनीता खोब्रागडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)