शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

१३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

नागपूर : दुसºया लाटेच्या प्रकोपानंतर नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. १३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाली. तर, ग्रामीणमध्ये ...

नागपूर : दुसºया लाटेच्या प्रकोपानंतर नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. १३१ दिवसानंतर शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाली. तर, ग्रामीणमध्ये सलग सहाव्या एकही मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही. नागपूर जिल्ह्यात ५५ रुग्ण आढळून आले. यात जिल्हाबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू आहे. शहरात ३४ रुग्ण तर ग्रामीणमध्ये २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,७०६ झाली असून मृतांची संख्या ९०१६ वर पोहचली आहे.

कोरोनाचा दुसºया लाटेला फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठले होते. सात ते आठ हजाराच्या दरम्यान दैनंदिन रुग्ण आढळून येत होते. १९ एप्रिल रोजी शहरात ७५ तर ग्रामीण मिळून

जिल्ह्यात ११३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. २ मे रोजी ११२ मृत्यूनंतर रुग्ण व मृत्यूच्या संख्येत घट येऊ लागली. जून महिन्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले. नागपूर जिल्ह्यात ३ जूनपासून दैनंदिन मृत्यूची नोंद १०च्या आत होऊ लागली. मागील सहा दिवसांत शहरातील मृत्यूची संख्या १ असताना ग्रामीणमध्ये शुन्य मृत्यूची नोंद होत आहे.

-कोरोनाचा मृत्यूदर १.८९ टक्के

नागपूर जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर १.८९ टक्के, तर पॉझिटिव्हीटीचा दर ०.५९ टक्क्यांवर आला आहे. शुक्रवारी ९२७० नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ६७६० नमुन्यांमध्ये ०.५० टक्के तर ग्रामीणमधील २५१० नमुन्यांमध्ये ०.७९ टक्के रुग्ण बाधित आढळून आले. आज मृत्यू झालेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील असून नागपूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. १२८ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ९४ तर ग्रामीणमधील ३४ रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८८ टक्के आहे. जिल्ह्यात ११०२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यात २६५ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल तर, ८३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोनाचा दुसºया लाटेत शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद झाल्याने महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांच्या सेवेचा गौरव केला.

-सतर्क रहा, नियमांचे पालन करा

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, नागरिकांचा संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि मनपा व जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे शहरातील मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. कोरोनाचा तिसºया लाटेला थोपविण्यासाठी सतर्क राहण्याचे व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

-शहरातील मृत्यू

दिनांक : मृत्यू

७ फेब्रुवारी : ००

१५ फेब्रुवारी :०३

१९फेब्रुवारी:०४

१ मार्च :०४

१५ मार्च : ०७

१८ मार्च : १४

२५ मार्च : ३३

१ एप्रिल : ३५

१५ एप्रिल : ३९

१८ एप्रिल : ४५

१९ एप्रिल : ७५

२० एप्रिल : ५०

२५ एप्रिल : ४६

३० एप्रिल : ३९

१ मे : ५५

५ मे : ४८

१० मे : ३१

१५ मे : २२

३१ मे: ०६

५ जून : ०३

१५ जून : ०२

१८ जून : ००