शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

अखेर तुटलेल्या विजेच्या तारा, पडलेले खांब पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST

(लोकमत इंम्पॅक्ट) महावितरण कंपनीला १५ दिवसांनी आली जाग लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : वादळामुळे चिचाळा शिवारात विजेच्या तारा तुटल्या ...

(लोकमत इंम्पॅक्ट)

महावितरण कंपनीला १५ दिवसांनी आली जाग

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : वादळामुळे चिचाळा शिवारात विजेच्या तारा तुटल्या हाेत्या व काही खांबही उन्मळून पडले हाेते. त्यामुळे या भागातील कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. महावितरण कंपनीला १५ दिवसांनी का हाेईना जाग आली आणि त्यांनी त्या तुटलेल्या तारा व काेसळलेले खांब पूर्ववत केले.

वादळामुळे या भागातील वीज वितरण व्यवस्था काहीसी विस्कळीत झाली हाेती. त्यातच पंधरवड्यापूर्वी आलेल्या वादळामुळे चिचाळा शिवारातील सतीश पडोळे, रमेश बालपांडे, राजेश्वर नंदरधने, हेमंत महाकाळकर व ज्ञानेश्वर महाकाळकर यांच्या शेतातील विजेचे खांब उन्मळून पडले हाेते. त्यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला वारंवार सूचना व लेखी निवेदने देऊनही कंपनीचे कर्मचारी तारा जाेडण्यास व खांब व्यवस्थित करण्यास दिरंगाई करीत हाेते. विशेष म्हणजे, तारा व खांब शेतातच पडून हाेते.

यासंदर्भात लाेकमतमध्ये बुधवारी (दि. २) ‘विजेच्या तुटलेल्या तारा पूर्ववत कधी करणार?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते. वीजपुरवठा खंडित असल्यने भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत असून, त्या तारा चाेरीला जाण्याची शक्यताही त्या वृत्तात व्यक्त केली हाेती. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वृत्ताची तातडीने दखल घेत त्या तारा जाेडण्याचे व खांब व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या कामाला गुरुवारी (दि. ३) सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी दाेन दिवसात संपूर्ण काम पूर्ण करून पडलेले खांब पूर्ववत केले आणि त्यावर ताराही व्यवस्थित जाेडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.