शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

वर्षभरानंतर उघडली नाग नदी प्रकल्पाची फाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकेकाळी नागपूर शहराची जीवनदायिनी असलेली नाग नदी आज गटारामुळे मृत झाली आहे. नदीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकेकाळी नागपूर शहराची जीवनदायिनी असलेली नाग नदी आज गटारामुळे मृत झाली आहे. नदीतील जलस्रत नष्ट झाले असून शहरातील दूषित पाणी वाहून नेणारी सिवेरज वाहिनी बनली आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. या स्वप्नपूर्तीत पदाधिकारी व प्रशासनाची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र नाग नदी प्रकल्पासंदर्भात फेब्रुवारी २०२० नंतर एक वर्षाने जानेवारी २०२१ मध्ये दिल्लीत बैठक झाली. वर्षभरानंतर या प्रकल्पाची फाईल उघडण्यात आली. यामुळे मनपातील पदाधिकारी व अधिकारी या प्रकल्पाबाबत खरोखरच गंभीर आहेत का, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. मनपातील पदाधिकाऱ्यांनी वर्षभरात या प्रकल्पाचा केंद्राकडे पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२११७.७१ कोटीच्या नाग नदी प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १३२३.५१ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३८ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिका (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी)कडून १८६४.३ कोटी रुपये अर्थसाहाय्य घेण्यात येणार आहे. परंतु मनपाला आपल्या वाट्याच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. आर्थिक स्थिती बघता मनपाला हा भार उचलणे अवघड आहे.

...

सक्षम यंत्रणेचा अभाव

मनपाकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. हा प्रकल्प नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. परंतु यासाठी आधी मनपाला आपली यंत्रणा सक्षम करावी लागणार आहे.

.....

प्रक्रियेसाठीच लागतील दहा महिने

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वित्तीय मंजुरीनंतर ग्लोबर टेंडर काढले जाईल. त्यानंतर कंत्राटदार प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करेल. परंतु मनपाने अद्याप यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. दुसरीकडे प्रकल्पाला विलंब झाल्यास खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा वाढीव आर्थिक बोजा मनपा कशी उचलणार, हा प्रश्नच आहे.