शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सिलींगच्या जमिनीसाठी १६ वर्षांपासून लढा

By admin | Updated: December 20, 2014 02:36 IST

शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही.

दयानंद पाईकराव नागपूर शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही. त्यामुळे हताश झालेले प्रल्हाद महादेव भलावी हे १६ वर्षांपासून जमीन मिळेल या आशेपोटी शासनाचा आणि तहसिल कार्यालयाचा उंबरठा झिजवित आहेत.किसान अधिकार अभियानाच्या मोर्चात प्रल्हाद महादेव भलावी (६५) रा. पळसगाव ता. देवळी जिल्हा वर्धा हे सामील झाले आहेत. प्रल्हाद यांची पत्नी छबुबाई यांच्या नावाने शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. शेतीचा सातबाराही त्यांना देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात जमिनीचे वाटप केले नाही. मागील १६ वर्षांपासून ते शासनाकडे आणि तहसिल कार्यालयात जमीन मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आहेत. प्रल्हाद भलावी यांच्या कुटुंबात पत्नी छबुबाई आणि एक मुलगा आहे. जमीन नसल्यामुळे त्यांना, त्यांची पत्नी आणि मुलाला मजुरी करण्याची पाळी आली आहे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या मुलाला शिक्षण घेता आले नाही. रोजमजुरी करून ते आपली उपजीविका भागवित आहेत. पळसगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरगाव येथे त्यांना जमीन मिळणार होती. मागील वेळी त्यांनी ७२ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्यांना ६ महिन्यात जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली ६ महिन्यांची मुदतही संपली. त्यांचा हा लढा मागील १६ वर्षांपासून तसाच सुरू आहे. जमीन मिळेल आणि आपल्या मागील रोजमजुरीची कटकट बंद होईल या आशेने ते शासनाकडे आपली फिर्याद घेऊन मोर्चात सहभागी झाले आहेत.