शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे ! दोन दिवसात ४९४७ प्रवाशांनी रद्द केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

दयानंद पाईकराव नागपूर : गुरुवारी रात्री मुंबई मार्गावरील कसारा ते इगतपुरी दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर माती, दगड ...

दयानंद पाईकराव

नागपूर : गुरुवारी रात्री मुंबई मार्गावरील कसारा ते इगतपुरी दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेले. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मुसळधार पावसाची धास्ती घेतली असून दोन दिवसात ४९४७ प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला आहे.

कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे तसेच रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरवरून मुंबईला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावला, दुरांतो एक्स्प्रेस भुसावळला तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकला समाप्त करण्यात आली होती. तसेच २२ जुलै रोजी मुंबईवरून नागपूरला येणारी विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा मेल रद्द करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे आपण मध्येच अडकून पडू अशी भीती रेल्वे प्रवाशांना वाटत असल्यामुळे बहुतांश प्रवासी आपला प्रवासाचा बेत रद्द करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी २२४३ प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द करून तिकिटे रद्द केली. रेल्वेला त्यांना १३.४७ लाख रुपये परत करावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी २२ जुलै रोजी २७०४ प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्यामुळे रेल्वेला १५.७२ लाख परत करण्याची पाळी आली. यात मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. सध्या सर्व मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असून रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. परंतु ‘रिस्क’ नको म्हणून प्रवासी प्रवास करण्याचे टाळत असल्याचे दोन दिवसांच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

...........