शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: February 25, 2016 03:00 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

संघाशी जुळलेल्या व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप : थकीत पैसे परत देण्याची मागणीनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संघ वर्तुळातदेखील खळबळ माजली आहे. या शेतकऱ्यांची संंबंधित व्यापाऱ्याने सुमारे आठ लाखांनी फसवणूक केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. परंतु देशात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविणे सुरू केले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. मात्र त्यानंतर पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. सुरुवातीला त्याने शेतकऱ्यांना तारखांवर तारखा दिल्या व नंतर फोनदेखील उचलणे बंद केले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु त्यावर काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अगोदरच निसर्गाची अवकृपा होत असताना विकलेल्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत. परत आणखी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संघाचा केंद्र व राज्य शासनावर अंकुश आहे. त्यामुळे हक्काचे पैसे २८ फेब्रुवारीपर्यंत परत मिळाले नाही तर नागपुरातील संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित आरोपांसंदर्भात प्रतिक्रियेसाठी सुनील टालाटुले यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)आश्वासनपूर्तीची प्रतीक्षायासंबंधात आम्ही दिल्लीत जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. टालाटुले संघ स्वयंसेवक असल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु मदत करण्याचे नाकारले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. त्यांनी पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पैसे प्रशासनाने द्यायला हवे, ही आमची मागणी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोहन भागवत काका असल्याचा दावासुनील टालाटुले याची पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याने शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत माझे काका असून मुख्यमंत्री फडणवीस भाऊ आहेत. माझे कोणी काही बिघडवू शकत नाही, असे शब्द वापरल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज शिंदे यांनी केला.