शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: February 25, 2016 03:00 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

संघाशी जुळलेल्या व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप : थकीत पैसे परत देण्याची मागणीनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संघ वर्तुळातदेखील खळबळ माजली आहे. या शेतकऱ्यांची संंबंधित व्यापाऱ्याने सुमारे आठ लाखांनी फसवणूक केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. परंतु देशात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविणे सुरू केले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. मात्र त्यानंतर पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. सुरुवातीला त्याने शेतकऱ्यांना तारखांवर तारखा दिल्या व नंतर फोनदेखील उचलणे बंद केले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु त्यावर काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अगोदरच निसर्गाची अवकृपा होत असताना विकलेल्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत. परत आणखी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संघाचा केंद्र व राज्य शासनावर अंकुश आहे. त्यामुळे हक्काचे पैसे २८ फेब्रुवारीपर्यंत परत मिळाले नाही तर नागपुरातील संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित आरोपांसंदर्भात प्रतिक्रियेसाठी सुनील टालाटुले यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)आश्वासनपूर्तीची प्रतीक्षायासंबंधात आम्ही दिल्लीत जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. टालाटुले संघ स्वयंसेवक असल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु मदत करण्याचे नाकारले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. त्यांनी पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पैसे प्रशासनाने द्यायला हवे, ही आमची मागणी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोहन भागवत काका असल्याचा दावासुनील टालाटुले याची पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याने शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत माझे काका असून मुख्यमंत्री फडणवीस भाऊ आहेत. माझे कोणी काही बिघडवू शकत नाही, असे शब्द वापरल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज शिंदे यांनी केला.