शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: February 25, 2016 03:00 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

संघाशी जुळलेल्या व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप : थकीत पैसे परत देण्याची मागणीनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संघ वर्तुळातदेखील खळबळ माजली आहे. या शेतकऱ्यांची संंबंधित व्यापाऱ्याने सुमारे आठ लाखांनी फसवणूक केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. परंतु देशात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविणे सुरू केले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. मात्र त्यानंतर पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. सुरुवातीला त्याने शेतकऱ्यांना तारखांवर तारखा दिल्या व नंतर फोनदेखील उचलणे बंद केले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु त्यावर काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अगोदरच निसर्गाची अवकृपा होत असताना विकलेल्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत. परत आणखी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संघाचा केंद्र व राज्य शासनावर अंकुश आहे. त्यामुळे हक्काचे पैसे २८ फेब्रुवारीपर्यंत परत मिळाले नाही तर नागपुरातील संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित आरोपांसंदर्भात प्रतिक्रियेसाठी सुनील टालाटुले यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)आश्वासनपूर्तीची प्रतीक्षायासंबंधात आम्ही दिल्लीत जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. टालाटुले संघ स्वयंसेवक असल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु मदत करण्याचे नाकारले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. त्यांनी पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पैसे प्रशासनाने द्यायला हवे, ही आमची मागणी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोहन भागवत काका असल्याचा दावासुनील टालाटुले याची पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याने शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत माझे काका असून मुख्यमंत्री फडणवीस भाऊ आहेत. माझे कोणी काही बिघडवू शकत नाही, असे शब्द वापरल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज शिंदे यांनी केला.