शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवे अनुदानावर सौर ऊर्जा कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

नागपूर : शेतशिवारातील वन्यप्राण्यांकडून होत असलेले शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण ही योजना राबविण्याची मागणी ...

नागपूर : शेतशिवारातील वन्यप्राण्यांकडून होत असलेले शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण ही योजना राबविण्याची मागणी यापूर्वी अनेकदा वन विभागाकडे झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडेही ही मागणी नोंदविली आहे. मात्र यावर अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना यंदाही स्वत:हूनच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. लगतच शेतीही आहे. वाघ-बिबटसह इतरही वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. जंगलव्याप्त गावातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर अधिक असल्याने असल्याने हाती आलेले पीक वन्यप्राण्यांकडून नष्ट होत असते. उगवलेले पीक तसेच पेरलेले बियाणे रानडुकरांकडून उकरून खाल्ले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

...

ताडोबाच्या बफर झोनचा कित्ता गिरवावा

मागील पाच वर्षापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या गावात वनविभागाकडून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण अनुदान तत्त्वावर देण्यात आले आहे. यामुळे रानडुक्कर, चितळ, सांबर यासारख्या वन्यप्राण्यांकडून होत असलेले पिकाचे नुकसान टाळण्यात यश आले आहे. ही योजना फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आहे. यातील यश लक्षात घेऊन सौर ऊर्जेचे कुंपण शेतकऱ्यास अनुदान तत्त्वावर देण्याची योजना ‘मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण’ ही योजना राबविता येऊ शकते. इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी तत्कालीन वनमंत्र्यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती.

...

खर्च फक्त १३ हजार

सौर ऊर्जा कुंपणाचा खर्च फक्त १३ हजार रुपयांचा आहे. शेताभोवती सौर कुंपण लावण्यात येते. यात सोलर पॅनल, बॅटरी, तार याचा समावेश असतो. पीक नसेल तेव्हा सदर कुंपण काढून ठेवता येते. येणाऱ्या खर्चापैकी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१५ ते २०१९ या काळात आतापर्यंत येथे १,४६५ सौर ऊर्जा कुंपण वितरित केले आहेत.

...

असे आहेत फायदे

- शेतकऱ्यास जागली जाण्याची गरज नसते.

- वीज प्रवाह सोडून होणाऱ्या शिकारी टाळता येतील.

- मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येतो.

- रबी व अन्य पीक घेणे सहज शक्य होते.

- उत्पन्नवाढीला सहाय्यभूत आहे.

...