शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपातील परतावा नाकारल्याने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही परतावा देण्यास नकार देतात. त्यामुळे शेतकरी पिकांचा विमा काढण्यास फारसे उत्सुक नाहीत. खरीप हंगामात जिल्ह्यात १५,९२७ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला हाेता. बहुतेकांची पिके किडी व बुरशीजन्य राेगांमुळे नष्ट झालीत. मात्र, विमा कंपनीने हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देण्यास नकार दिला. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ही ५,२९३ वर आली.

जिल्ह्यात पीक विम्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमी. कंपनीला नियुक्त केले आहे. खरीप हंगामात साेयाबीनचे येल्लाे माेझॅक, किडी व इतर बुरशीजन्य राेग, कपाशीचे गुलाबी बाेंडअळी, बाेंडसड व काही बुरशीजन्य राेग, धानाचे तपकिरी तुडतुडे तसेच तुरीची पाने व शेंगा खाणाऱ्या अळींमुळे प्रचंड नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला या नुकसानाबाबत कळविले. ही पिके किडीं व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्याचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी दिला. परंतु, हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचे विमा कंपनीने शेतकऱ्यांना कळविले आहे. विमा कंपनीने साेयाबीनच्या विम्यापाेटी शेतकऱ्यांकडून ३७८ रुपये घेण्यात आले हाेते. यात केंद्र व राज्य शासनाचा वाटा अनुक्रमे ३,०२४ रुपयांचा हाेता. गव्हासाठी ही रक्कम अनुक्रमे ५७० रुपये व १,९९५ रुपये तर हरभऱ्यासाठी ती ५२५ रुपये व १,८३७.५० रुपये एवढी आहे. पैसे भरूनही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असेल, न्याय मागण्यासाठी न्यायालय अथवा ग्राहक मंचकडे जावे लागत असेल तर आपण पीक विमा काढायचा कशासाठी, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

---

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

मी खरीप हंगामात साेयाबीनचा विमा भरला हाेता. येल्लाे माेझॅक व किडींमुळे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने कंपनीला कळविले. हे नुकसान धुक्यामुळे झाल्याचा दावा कंपनीने केला. कृषी अधिकारी व इतरांच्या मते किडींमुळे पीक नष्ट झाले. त्यामुळे रबी पिकाचा विमा भरला नाही.

- दिलीप हिवरकर, जलालखेडा.

--

खरीप नुकसानीचे अनुदान

नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये २,१२,११० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १,०२,३८७ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. सततचा पाऊस, जमिनीत पाण्याचा न झालेला निचरा, प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यात कपाशीचे ९१ टक्के तर साेयाबीनच्या पिकाचे ९४ टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही. शिवाय, पीक विमा कंपनीने परतावा नाकारला आहे.