शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपातील परतावा नाकारल्याने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही परतावा देण्यास नकार देतात. त्यामुळे शेतकरी पिकांचा विमा काढण्यास फारसे उत्सुक नाहीत. खरीप हंगामात जिल्ह्यात १५,९२७ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला हाेता. बहुतेकांची पिके किडी व बुरशीजन्य राेगांमुळे नष्ट झालीत. मात्र, विमा कंपनीने हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देण्यास नकार दिला. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ही ५,२९३ वर आली.

जिल्ह्यात पीक विम्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमी. कंपनीला नियुक्त केले आहे. खरीप हंगामात साेयाबीनचे येल्लाे माेझॅक, किडी व इतर बुरशीजन्य राेग, कपाशीचे गुलाबी बाेंडअळी, बाेंडसड व काही बुरशीजन्य राेग, धानाचे तपकिरी तुडतुडे तसेच तुरीची पाने व शेंगा खाणाऱ्या अळींमुळे प्रचंड नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला या नुकसानाबाबत कळविले. ही पिके किडीं व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्याचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी दिला. परंतु, हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचे विमा कंपनीने शेतकऱ्यांना कळविले आहे. विमा कंपनीने साेयाबीनच्या विम्यापाेटी शेतकऱ्यांकडून ३७८ रुपये घेण्यात आले हाेते. यात केंद्र व राज्य शासनाचा वाटा अनुक्रमे ३,०२४ रुपयांचा हाेता. गव्हासाठी ही रक्कम अनुक्रमे ५७० रुपये व १,९९५ रुपये तर हरभऱ्यासाठी ती ५२५ रुपये व १,८३७.५० रुपये एवढी आहे. पैसे भरूनही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असेल, न्याय मागण्यासाठी न्यायालय अथवा ग्राहक मंचकडे जावे लागत असेल तर आपण पीक विमा काढायचा कशासाठी, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

---

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

मी खरीप हंगामात साेयाबीनचा विमा भरला हाेता. येल्लाे माेझॅक व किडींमुळे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने कंपनीला कळविले. हे नुकसान धुक्यामुळे झाल्याचा दावा कंपनीने केला. कृषी अधिकारी व इतरांच्या मते किडींमुळे पीक नष्ट झाले. त्यामुळे रबी पिकाचा विमा भरला नाही.

- दिलीप हिवरकर, जलालखेडा.

--

खरीप नुकसानीचे अनुदान

नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये २,१२,११० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १,०२,३८७ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. सततचा पाऊस, जमिनीत पाण्याचा न झालेला निचरा, प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यात कपाशीचे ९१ टक्के तर साेयाबीनच्या पिकाचे ९४ टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही. शिवाय, पीक विमा कंपनीने परतावा नाकारला आहे.