शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

खरीपातील परतावा नाकारल्याने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही परतावा देण्यास नकार देतात. त्यामुळे शेतकरी पिकांचा विमा काढण्यास फारसे उत्सुक नाहीत. खरीप हंगामात जिल्ह्यात १५,९२७ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला हाेता. बहुतेकांची पिके किडी व बुरशीजन्य राेगांमुळे नष्ट झालीत. मात्र, विमा कंपनीने हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देण्यास नकार दिला. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ही ५,२९३ वर आली.

जिल्ह्यात पीक विम्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमी. कंपनीला नियुक्त केले आहे. खरीप हंगामात साेयाबीनचे येल्लाे माेझॅक, किडी व इतर बुरशीजन्य राेग, कपाशीचे गुलाबी बाेंडअळी, बाेंडसड व काही बुरशीजन्य राेग, धानाचे तपकिरी तुडतुडे तसेच तुरीची पाने व शेंगा खाणाऱ्या अळींमुळे प्रचंड नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला या नुकसानाबाबत कळविले. ही पिके किडीं व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्याचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी दिला. परंतु, हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचे विमा कंपनीने शेतकऱ्यांना कळविले आहे. विमा कंपनीने साेयाबीनच्या विम्यापाेटी शेतकऱ्यांकडून ३७८ रुपये घेण्यात आले हाेते. यात केंद्र व राज्य शासनाचा वाटा अनुक्रमे ३,०२४ रुपयांचा हाेता. गव्हासाठी ही रक्कम अनुक्रमे ५७० रुपये व १,९९५ रुपये तर हरभऱ्यासाठी ती ५२५ रुपये व १,८३७.५० रुपये एवढी आहे. पैसे भरूनही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असेल, न्याय मागण्यासाठी न्यायालय अथवा ग्राहक मंचकडे जावे लागत असेल तर आपण पीक विमा काढायचा कशासाठी, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

---

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

मी खरीप हंगामात साेयाबीनचा विमा भरला हाेता. येल्लाे माेझॅक व किडींमुळे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने कंपनीला कळविले. हे नुकसान धुक्यामुळे झाल्याचा दावा कंपनीने केला. कृषी अधिकारी व इतरांच्या मते किडींमुळे पीक नष्ट झाले. त्यामुळे रबी पिकाचा विमा भरला नाही.

- दिलीप हिवरकर, जलालखेडा.

--

खरीप नुकसानीचे अनुदान

नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये २,१२,११० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १,०२,३८७ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. सततचा पाऊस, जमिनीत पाण्याचा न झालेला निचरा, प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यात कपाशीचे ९१ टक्के तर साेयाबीनच्या पिकाचे ९४ टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही. शिवाय, पीक विमा कंपनीने परतावा नाकारला आहे.