शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतकऱ्यांची अनुदान कोंडी

By admin | Updated: May 8, 2017 02:10 IST

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मागील वर्षी आटापिटा करू न शासनाच्या योजनांमधून विविध कृषी उपयोगी साधन-साहित्य

खरीप हंगाम तोंडावर : कृषी विभागाचा लेटलतिफपणा जीवन रामावत। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मागील वर्षी आटापिटा करू न शासनाच्या योजनांमधून विविध कृषी उपयोगी साधन-साहित्य आणि औजारांची खरेदी केली. यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासकीय अनुदानाची रक्कम जमा होणे अपेक्षित होते. मात्र केवळ कृषी विभागाच्या लेटलतिफपणामुळे मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे अनुदान अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मागील २०१६-१७ आर्थिक वर्ष उलटून आता दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. शिवाय खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी हा खत व बी-बियाणे खरेदीच्या तयारीला लागला आहे. असे असताना शेतकऱ्यांचे विविध योजनांमधील अडलेले अनुदान एक गंभीर मुद्दा बनला आहे. कृषी विभागातर्फे ठिंबक व तुषार सिंचनासह ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, प्लांटर, मळणी यंत्र, मिनी राईस मिल, दाल मिल, कापूस पऱ्हाटी श्रेडर, उस पाचट कुट्टी श्रेडर, मल्चर, बुम स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर व सब सॉईलर अशा विविध साहित्यांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान दिल्या जाते. मात्र सुरुवातीला शेतकऱ्यांना या सर्व साहित्याची कृषी विभागाची पूर्वसंमती घेऊन स्वत:च खरेदी करावी लागते. यानंतर त्या साहित्याचे खरेदी बिलासह कृषी विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला जातो. अशाप्रकारे संबंधित शेतकऱ्याने तो प्रस्ताव सादर केल्यानंतर कमला २० दिवसांत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर त्याचे अनुदान जमा होणे अपेक्षित आहे. मात्र केवळ कृषी विभागाच्या लेटलतिफशाहीमुळे शेतकऱ्यांना या अनुदानासाठी वर्षभर कृृषी विभागाचा उंबरठा झिंजवावा लागतो. अशाच मागील २०१६-१७ या आर्थिक वर्षांत विविध योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कृषी साहित्य आणि औजारांचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. जाणकारांच्या मते, कृषी विभागाने मागील आर्थिक वर्षांत राबविलेल्या सर्व शासकीय योजनांचे शासकीय अनुदान गत ३१ मार्च पूर्वीच कृषी विभागाच्या खात्यावर जमा झाले आहे. यानंतर ते लगेच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते. परंतु कृषी अधिकाऱ्यांनी स्वत:ची मनमानी करीत अजूनपर्यंत ते अनुदान शेतकऱ्यांना दिलेले नाही. तरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, संबंधित कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ अधिकारी बैठकांत व्यस्त यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी केवळ बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरू न जिल्ह्यात दौरे करणे अपेक्षित आहे. परंतु माहिती सूत्रानुसार या कार्यालयातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दौऱ्याची ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यालय आणि बैठका एवढेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनविले आहे. वास्तविक कृषी अधिकारी हा कार्यालयापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर अधिक दिसावा, असे अपेक्षित असते. त्याशिवाय तो शेतकऱ्यांच्या समस्या आणि गरजा समजूच शकत नाही. मात्र असे असताना या कार्यालयातील बहुतांश कृषी अधिकारी केवळ कार्यालयात बसून शेतकऱ्यांना प्रबोधनाचे डोज पाजणे एवढीच आपली जबाबदारी समजत आहे.