शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

पशुधनानेच होणार शेतकऱ्यांचा विकास  : गिरीराज सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:54 IST

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न ...

ठळक मुद्देअ‍ॅग्रो व्हिजनमध्ये डेअरी विकासावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न वाढवावे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच वाढ होणार आहे. देशात पशुधन वाढल्यास शेतकरी आणि युवकांच्या रोजगारात वाढ होईल. पशुधनाने शेतकऱ्यांना ३६५ दिवस निश्चितच काम मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुधन दुग्ध विकास आणि मत्सपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे केले.अ‍ॅग्रोव्हिजनतर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘विदर्भातील दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मिश्रा, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत वासनिक, मीरत येथील पशुसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.व्ही. पाटील, पशुसंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी.के. घोष, इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन डॉ. आर.डी. कोकणे, डॉ. सत्येंदर सिंग आर्य, लक्ष्मीनारायण मिश्रा, सत्राचे समन्वयक डॉ. सी.डी. मायी आणि रवी बोरटकर उपस्थित होते.अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकरी आणि नवयुवकांना माहिती देण्याचे नितीन गडकरी यांचे कार्य सर्वोत्तम असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकाचे पॅटर्न बदलवावे. सोबतच पशुधनाचा अवलंब करावा. देशात १.७० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. ते दरवर्षी वाढत आहे. डेअरीमध्ये २२ टक्के वाटा आहे. कृषी आधारित पशुधन असते तर देशाचा विकास वेगात झाला असता. देशात पशुधनाची निर्यात ७५ ते ८० हजार कोटींची आहे. ती टेक्सटाईल उद्योगापेक्षा दुप्पट आहे. कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगात कोट्यवधींची गुंतवणूक होणार असल्याचे सीआयआरने म्हटले आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे.दुधासोबत चाऱ्याचे उत्पादन वाढवावे लागेल. शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनविण्यास उत्सुक नाही, ही देशाची शोकांतिका आहे. शेतीचे गुंतवणूक मूल्य कमी झाल्यास लोक शेतीकडे वळतील, असे मत गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.दिलीप रथ म्हणाले, विदर्भात दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात अ‍ॅग्रोव्हिजनमुळे मोठे परिवर्तन आले आहे. पुढील दोन वर्षात दररोज ३.५ लाख लिटर दूध संकलनाचे मदर डेअरीचे लक्ष्य आहे.प्रास्तविक डॉ. सी.डी. मायी यांनी तर आभार रवी बोरटकर यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री