शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनानेच होणार शेतकऱ्यांचा विकास  : गिरीराज सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:54 IST

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न ...

ठळक मुद्देअ‍ॅग्रो व्हिजनमध्ये डेअरी विकासावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न वाढवावे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच वाढ होणार आहे. देशात पशुधन वाढल्यास शेतकरी आणि युवकांच्या रोजगारात वाढ होईल. पशुधनाने शेतकऱ्यांना ३६५ दिवस निश्चितच काम मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुधन दुग्ध विकास आणि मत्सपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे केले.अ‍ॅग्रोव्हिजनतर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘विदर्भातील दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मिश्रा, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत वासनिक, मीरत येथील पशुसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.व्ही. पाटील, पशुसंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी.के. घोष, इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन डॉ. आर.डी. कोकणे, डॉ. सत्येंदर सिंग आर्य, लक्ष्मीनारायण मिश्रा, सत्राचे समन्वयक डॉ. सी.डी. मायी आणि रवी बोरटकर उपस्थित होते.अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकरी आणि नवयुवकांना माहिती देण्याचे नितीन गडकरी यांचे कार्य सर्वोत्तम असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकाचे पॅटर्न बदलवावे. सोबतच पशुधनाचा अवलंब करावा. देशात १.७० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. ते दरवर्षी वाढत आहे. डेअरीमध्ये २२ टक्के वाटा आहे. कृषी आधारित पशुधन असते तर देशाचा विकास वेगात झाला असता. देशात पशुधनाची निर्यात ७५ ते ८० हजार कोटींची आहे. ती टेक्सटाईल उद्योगापेक्षा दुप्पट आहे. कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगात कोट्यवधींची गुंतवणूक होणार असल्याचे सीआयआरने म्हटले आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे.दुधासोबत चाऱ्याचे उत्पादन वाढवावे लागेल. शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनविण्यास उत्सुक नाही, ही देशाची शोकांतिका आहे. शेतीचे गुंतवणूक मूल्य कमी झाल्यास लोक शेतीकडे वळतील, असे मत गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.दिलीप रथ म्हणाले, विदर्भात दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात अ‍ॅग्रोव्हिजनमुळे मोठे परिवर्तन आले आहे. पुढील दोन वर्षात दररोज ३.५ लाख लिटर दूध संकलनाचे मदर डेअरीचे लक्ष्य आहे.प्रास्तविक डॉ. सी.डी. मायी यांनी तर आभार रवी बोरटकर यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री