शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.

ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांचे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याचा महत्त्वकांशी मेडीगड्डा प्रकल्प पूर्णत्त्वास आला. परंतु या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अनेक जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त महसूल विभाग कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. ही अडचण जाणून प्रकल्पग्रस्तांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, वडिलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली पोचमपल्ली रै. येथील शेतजमीन प्रकल्पात गेली. या जमिनीव्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाही. या शेतजमिनीवरच उपजीविका चालविली जात होती. तेलंगणा राज्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०१८ मध्ये रितसर रजिस्टर्ड विक्री पत्रान्वये जमीन हस्तांतरित केली. या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात किंवा धनादेशामार्फत एका आठवड्यात देण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी कबूल केले होते. परंतु पोचमपल्ली येथील एका व्यक्तीने काही खोट्या व बनावटी दस्तावेजांच्या आधारे आपल्या विरूद्ध अवैैध आक्षेप घेतला आहे, असे कारण सांगून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदला अद्यापही दिला नाही.प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्नमोबदल्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयाला भेट देऊन मागणी केली. परंतु संबंधित कार्यालयाचे अधिकारी मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असता तेलंगणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश सिरोंचा तहसीलदारांकडे वितरित करण्यास पाठविले. परंतु तहसीलदारांसुद्धा याबाबत माहिती घेऊनही पोचमपल्ली येथील काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी