शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शेतकऱ्यांचा भारत बंद, विविध संघटनांचा सहभाग.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना संमत केले आहेत. हे कायदे शेती व शेतकरी विरोधी आहेत .म्हणून देश भरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलन समर्थनार्थ कष्टकरी जन आंदोलनचे विलास भोंगाडे, रोशनी गंभीर, वैशाली पाटील ,सरिता जुनघरे,अश्विनी भारद्वाज यांनी नारे निदर्शने करून धरणे दिले.

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली हाेती. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून या बंदमध्ये सहभागी झाले. यामध्ये सी.आय. टी.यू. संघटनेनेही सहभाग घेतला हाेता. आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनने बंदला पाठिंबा देत संप केला. मंगळवारी संविधान चौक येथे धरणे आंदाेलन केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, कांचन बोरकर, रूपलता बोंबले, शुभांगी चिचमलकर, माया कावळे, गीता विश्वकर्मा, ज्योती कावळे, रिया रेवतकर, वैशाली टेकाडे, मंदा गांधारे, रेखा पानतावणे, मंदा जाधव, अरणा शेंडे, संगीता मेश्राम, यांच्या नेतृत्वात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक आंदोलनात सहभागी झाले.