शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जमीन हडपण्यासाठी लाखनीतून निघाले बनावट मुखत्यारपत्र

By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST

येथील अकोली वळण मार्गालगतची जमीन हडपण्यासाठी चक्क बहिणीनेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा

बहिणीचा कारनामा : बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारअमरावती : येथील अकोली वळण मार्गालगतची जमीन हडपण्यासाठी चक्क बहिणीनेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात बहिणीविरुद्ध दोन भावांनी तक्रार नोंदविली आहे. बडनेरा येथील रहिवासी रामदास व गणेश कातोरे या दोन भावांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करुन त्यांची बहीण शकुंतला रंगराव सपाटे यांनी १२ आॅक्टोबर २०१२ रोजी मुखत्यारपत्र तयार केले. कातोरे बंधू बडनेरा येथील रहिवासी असताना त्यांना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मौजा लाखोरी येथील रहिवासी दाखविण्यात आले आहे. भूमापन क्र.२८२/२, भोगवटदार वर्ग-१, आकारणी १९.३३ पैकी गणेश कातोरे व रामदास कातोरे यांच्या नावे प्रत्येकी ०.८१ हे.आर.जमीन आहे. दोन्ही भाऊ उद्योग-व्यवसायात व्यस्त राहात असल्याने शेतीविषयक कामकाज सांभाळू शकत नसल्याचे कारण पुढे करुन त्यांची सख्खी बहीण शकुंतला सपाटे(कातोरे) यांना खास मुखत्यार नेमत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.या जमिनीच्या कोणत्याही भागाच्या विक्रीचे, करारावर देण्याचे, सर्वाधिकार मुखत्यारपत्राव्दारे शकुंतला सपाटे यांना बहाल करण्यात आले होते. मात्र मुखत्यारपत्र तयार करताना गणेश व रामदास कातोरे यांच्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रेही सादर करण्यात आली. लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. हे बनावट मुखत्यारपत्र तयार करताना बनावट निवडणूक ओळखपत्र, व बनावट प्रतिज्ञापत्रदेखील जोडल्याचे कातोरे बंधुंनी तक्रारीत म्हटले आहे. साक्षीदार म्हणून भरत उरकुडे, पे्रमसागर उरकुडे यांची नावे आहेत. एकाच नावाच्या व्यक्ती बडनेरा आणि लाखनी येथे वास्तव्यास कशा असूू शकतात, हा प्रश्नही तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे शासकीय दस्तावेजांचे सर्व व्यवहार संगणक प्रणालीने होत असताना बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सुध्दा सक्रिय झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आहे. शेती हडपण्यासाठी बहिणीने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणे व खोटी व्यक्ती उपस्थित करुन फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी कातोरे बंधुंनी केली आहे. (प्रतिनिधी)