शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गणवेशावर डोळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला ...

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला निधीचेही वितरण झाले असून, जि.प. शिक्षण विभागाच्या माध्यमातून निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाला आहे. पण गणवेशाचे कापड आयएसआय दर्जाचे असावेत, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी दिली आहे. एका कापड निर्मात्या कंपनीचे प्रतिनिधी आमचे कापड आयएसआय दर्जाचे असल्याची बतावणी करीत जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागात फिरत आहे. दुसरीकडे गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याने, शाळा व्यवस्थापन समिती आयएसआय दर्जाच्या कापडाचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे आयएसआय सर्टिफिकेशनचा आग्रह विधानसभेच्या दोन सदस्यांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात एकच कंपनी आयएसआय दर्जाची कापड निर्मिती करीत असल्याचा दावा करीत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व सर्वच प्रवर्गातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात येते. समग्र शिक्षा अभियान केंद्र सरकारमार्फत राबविले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गणवेशाची खरेदी आयएसआय दर्जाच्या कापडाची करावी, असा उल्लेख नाही. मात्र विभागाच्या उपसचिवांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणवेशासाठी कापड हे आयएसआय दर्जाचे असावे, असे निर्देश दिले आहे. या पत्रानंतर मुंबईतील एका कंपनीचे प्रतिनिधी राज्यातील जि.प.च्या शिक्षण विभागात पोहचत आहे. ते आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती करीत असल्याचे सांगत आहे.

विशेष म्हणजे गणवेशाच्या खरेदीचे अधिकार नियमानुसार शालेय व्यवस्थापन समितीला असते. पण यंदा नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जि.प.च्या विद्यार्थ्यांमध्ये एकसूत्रीपणा ठेवण्यासाठी एकाच रंगाचा गणवेश सर्व शाळांसाठी मंजूर केला आहे. आता आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती एकच कंपनी करीत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीला इकडे-तिकडे भटकण्याचा पर्यायच राहिलेला नाही. रंगही एकच असल्याचे वरून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार गणवेशाची खरेदी करायची आहे. कोट्यवधीचा निधी गणवेशासाठी केंद्र सरकारने राज्याला दिला आहे. त्यामुळे गणवेशाकडे अनेकांचे डोळे वटारले आहे.