शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विद्यार्थ्यांच्या गणवेशावर डोळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला ...

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला निधीचेही वितरण झाले असून, जि.प. शिक्षण विभागाच्या माध्यमातून निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाला आहे. पण गणवेशाचे कापड आयएसआय दर्जाचे असावेत, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी दिली आहे. एका कापड निर्मात्या कंपनीचे प्रतिनिधी आमचे कापड आयएसआय दर्जाचे असल्याची बतावणी करीत जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागात फिरत आहे. दुसरीकडे गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याने, शाळा व्यवस्थापन समिती आयएसआय दर्जाच्या कापडाचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे आयएसआय सर्टिफिकेशनचा आग्रह विधानसभेच्या दोन सदस्यांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात एकच कंपनी आयएसआय दर्जाची कापड निर्मिती करीत असल्याचा दावा करीत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व सर्वच प्रवर्गातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात येते. समग्र शिक्षा अभियान केंद्र सरकारमार्फत राबविले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गणवेशाची खरेदी आयएसआय दर्जाच्या कापडाची करावी, असा उल्लेख नाही. मात्र विभागाच्या उपसचिवांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणवेशासाठी कापड हे आयएसआय दर्जाचे असावे, असे निर्देश दिले आहे. या पत्रानंतर मुंबईतील एका कंपनीचे प्रतिनिधी राज्यातील जि.प.च्या शिक्षण विभागात पोहचत आहे. ते आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती करीत असल्याचे सांगत आहे.

विशेष म्हणजे गणवेशाच्या खरेदीचे अधिकार नियमानुसार शालेय व्यवस्थापन समितीला असते. पण यंदा नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जि.प.च्या विद्यार्थ्यांमध्ये एकसूत्रीपणा ठेवण्यासाठी एकाच रंगाचा गणवेश सर्व शाळांसाठी मंजूर केला आहे. आता आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती एकच कंपनी करीत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीला इकडे-तिकडे भटकण्याचा पर्यायच राहिलेला नाही. रंगही एकच असल्याचे वरून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार गणवेशाची खरेदी करायची आहे. कोट्यवधीचा निधी गणवेशासाठी केंद्र सरकारने राज्याला दिला आहे. त्यामुळे गणवेशाकडे अनेकांचे डोळे वटारले आहे.