शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विद्यार्थ्यांच्या गणवेशावर डोळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला ...

नागपूर : केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानातून यंदा शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाची तरतूद केली आहे. राज्याला निधीचेही वितरण झाले असून, जि.प. शिक्षण विभागाच्या माध्यमातून निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाला आहे. पण गणवेशाचे कापड आयएसआय दर्जाचे असावेत, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी दिली आहे. एका कापड निर्मात्या कंपनीचे प्रतिनिधी आमचे कापड आयएसआय दर्जाचे असल्याची बतावणी करीत जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागात फिरत आहे. दुसरीकडे गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याने, शाळा व्यवस्थापन समिती आयएसआय दर्जाच्या कापडाचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे आयएसआय सर्टिफिकेशनचा आग्रह विधानसभेच्या दोन सदस्यांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात एकच कंपनी आयएसआय दर्जाची कापड निर्मिती करीत असल्याचा दावा करीत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व सर्वच प्रवर्गातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात येते. समग्र शिक्षा अभियान केंद्र सरकारमार्फत राबविले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गणवेशाची खरेदी आयएसआय दर्जाच्या कापडाची करावी, असा उल्लेख नाही. मात्र विभागाच्या उपसचिवांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणवेशासाठी कापड हे आयएसआय दर्जाचे असावे, असे निर्देश दिले आहे. या पत्रानंतर मुंबईतील एका कंपनीचे प्रतिनिधी राज्यातील जि.प.च्या शिक्षण विभागात पोहचत आहे. ते आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती करीत असल्याचे सांगत आहे.

विशेष म्हणजे गणवेशाच्या खरेदीचे अधिकार नियमानुसार शालेय व्यवस्थापन समितीला असते. पण यंदा नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जि.प.च्या विद्यार्थ्यांमध्ये एकसूत्रीपणा ठेवण्यासाठी एकाच रंगाचा गणवेश सर्व शाळांसाठी मंजूर केला आहे. आता आयएसआय दर्जाच्या कापडाची निर्मिती एकच कंपनी करीत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीला इकडे-तिकडे भटकण्याचा पर्यायच राहिलेला नाही. रंगही एकच असल्याचे वरून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार गणवेशाची खरेदी करायची आहे. कोट्यवधीचा निधी गणवेशासाठी केंद्र सरकारने राज्याला दिला आहे. त्यामुळे गणवेशाकडे अनेकांचे डोळे वटारले आहे.