शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कोरोनामुळे अनुदान देयके स्वीकारण्याची तारीख वाढवा : हायकोर्टाचा कोषागारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:54 IST

चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला.

ठळक मुद्दे२७ मार्च तारीख ठरविण्यावरून ओढले ताशेरे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनावरील उपाययोजनांतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारने कार्यालयांमध्ये ५ टक्क्यांवर कर्मचारी उपस्थित ठेवण्यास मनाई केली आहे. सर्वांचे लक्ष कोरोनाला नष्ट करण्यावर केंद्रित आहे. अशा परिस्थितीत चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी २७ मार्च ही अंतिम तारीख ठरवणे सर्वांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे वादग्रस्त निर्णयावर पुनर्विचार करून चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयात सी. एच. शर्मा व इतरांची सरकारी रुग्णालयांच्या सर्वांगीन विकासासंदर्भातील जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात हा मुद्दा हाताळण्यात आला. वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांच्या आदेशानुसार लेखा व कोषागार विभागाचे संचालकांनी २४ मार्च रोजी संबंधित निर्णयाचे परिपत्रक जारी केले होते. जिल्हा कोषागार व उप-कोषागार आणि अधिदान व लेखा कार्यालय येथे चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके २७ मार्चपर्यंतच स्वीकारण्यात यावेत असे निर्देश त्याद्वारे देण्यात आले होते. तसेच, या तारखेनंतर केवळ कोरोना आजाराशी निगडित देयके स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोनामुळे कर्मचारी कमी करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते.याचिकेतील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी गुरुवारी या मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून २७ मार्च ही तारीख सर्वांसाठी गैरसोयीची असल्याचे सांगितले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले व वरील आदेश दिला.कोरोना नियंत्रणावर वाईट परिणाम करणारा निर्णयदेयके स्वीकारण्याची २७ मार्च ही अंतिम तारीख ठरविणारा निर्णय कोरोना नियंत्रणाच्या प्रयत्नांवर वाईट परिणाम करणारा आहे. तसेच, हा निर्णय एकतर्फी  व न्यायतत्वाचे उल्लंघन करणाराही आहे असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. सर्व वैद्यकीय यंत्रणा व संबंधित प्राधिकरणे कोरोना नष्ट करण्यामध्ये गुंतली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावरील लक्ष हटवून देयके सादर करण्याचे काम करणे अशक्य आहे. तसेच, कोरोना नियंत्रण उपाययोजनांतर्गत सर्व शासकीय विभागांतील कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे. परिणामी, २७ मार्चपर्यंत देयके सादर करणे शक्य होणार नाही. देयके स्वीकारण्यासाठी ३१ मार्चनंतरची तारीख निश्चित केली असती तर, सर्वांच्या सोयीचे झाले असते. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपायांची गरज आहे. त्यामुळे वित्त व कोषागार प्राधिकरणांनी परिस्थिती पाहून सोयिस्कर निर्णय घ्यायला पाहिजे होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या