शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा उत्साह, पावसाची चिंता अन् तिकिटांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 12:06 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल? : तीन वर्षानंतर होतोय सामना

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.

जामठा मैदानावर आतापर्यंत १२ पुरुषांचे व महिलांचे दोन टी-२० सामने खेळले गेले आहेत. नागपुरात शेवटचा भारत टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता. दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे. क्रिकेट सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सामना पाहण्यासाठी नागपूर विदर्भासह नजीकच्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातून क्रिकेट चाहते हजेरी लावणार आहेत. ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियमची सर्व तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपल्याने अनेकांची घोर निराशा झाली. लढतीवर मात्र पावसाचे सावट आहे.

सामन्याच्या दिवशी पाऊस..

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सामन्याच्या दिवशी सकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. सामना सायंकाळी ७ वाजेपासून असल्याने त्यावेळी पाऊस हजेरी लावेल का, हे हमखास सांगता येणार नाही. आकाश मात्र दिवसभर आणि सायंकाळी ढगाळ असेल. दरम्यान मंगळवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावताच बुधवारी जामठा मैदानाशेजारच्या पार्किंगच्या जागेवर चिखल झाला होता. सभोवताल शेताची जमीन असल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने चिखलात फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तिकिटे 'सोल्ड आउट'

  • सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच संपल्यामुळे सोशल मीडियावर 'ब्लॅक'मध्ये विक्रीची जोरात चर्चा सुरु झाली. रविवारी ऑनलाइन तिकिटे पहिल्या दहा मिनिटात संपल्याने आता काळ्याबाजारातून 'तिकिटांचे 'मॅनेजमेंट' होते का, अशीही विचारणा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी कानोसा घेतला तेव्हा ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे सर्व प्रकारची तिकिटे उपलब्ध असून, अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यात येत आहे.
  • ६५० रुपयांच्या तिकिटांपासून तर महागडे तिकीटही या ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी क्रिकेट शौकिनांती केली. तिकिटे न मिळाल्याने दिवसभर अनेकांनी सोशल माध्यमांवर दिवसभर संताप मांडत खदखद व्यक्त केली. तिकीट विक्रीची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; ५०० चे तिकीट २५०० तर २००० चे ५ हजारांना

काही जुगाड आहे का?

क्रिकेटप्रेमी नागपुरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांना फोन करून तिकिटांचा जुगाड आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. प्रयत्न करूनदेखील तिकीट न मिळाल्याने बहुतांश जणांचा भ्रमनिराश झाला. काहींना एक तर काहींना दोन तिकीट उपलब्ध झाली खरी; मात्र कुटुंबातील प्रत्येकाला सामना पाहण्याची इच्छा असल्याने अनेकांनी चढ्या दराने जवळची तिकिटे विकून टाकली.

जामठ्यात भारताचेच वर्चस्व

जामठा स्टेडियमवर याआधी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले गेले. सर्व पाचही सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. टी-२०त अव्वल असलेला भारतीय संघ आपल्या वि विक्रमात आणखी एका विजयाची भर घालण्यास इच्छुक असेल. दुसरीकडे या प्रकारातील विश्वविजेता ऑस्ट्रेलियादेखील जामठा मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर