शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा उत्साह, पावसाची चिंता अन् तिकिटांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 12:06 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल? : तीन वर्षानंतर होतोय सामना

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.

जामठा मैदानावर आतापर्यंत १२ पुरुषांचे व महिलांचे दोन टी-२० सामने खेळले गेले आहेत. नागपुरात शेवटचा भारत टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता. दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे. क्रिकेट सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सामना पाहण्यासाठी नागपूर विदर्भासह नजीकच्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातून क्रिकेट चाहते हजेरी लावणार आहेत. ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियमची सर्व तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपल्याने अनेकांची घोर निराशा झाली. लढतीवर मात्र पावसाचे सावट आहे.

सामन्याच्या दिवशी पाऊस..

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सामन्याच्या दिवशी सकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. सामना सायंकाळी ७ वाजेपासून असल्याने त्यावेळी पाऊस हजेरी लावेल का, हे हमखास सांगता येणार नाही. आकाश मात्र दिवसभर आणि सायंकाळी ढगाळ असेल. दरम्यान मंगळवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावताच बुधवारी जामठा मैदानाशेजारच्या पार्किंगच्या जागेवर चिखल झाला होता. सभोवताल शेताची जमीन असल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने चिखलात फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तिकिटे 'सोल्ड आउट'

  • सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच संपल्यामुळे सोशल मीडियावर 'ब्लॅक'मध्ये विक्रीची जोरात चर्चा सुरु झाली. रविवारी ऑनलाइन तिकिटे पहिल्या दहा मिनिटात संपल्याने आता काळ्याबाजारातून 'तिकिटांचे 'मॅनेजमेंट' होते का, अशीही विचारणा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी कानोसा घेतला तेव्हा ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे सर्व प्रकारची तिकिटे उपलब्ध असून, अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यात येत आहे.
  • ६५० रुपयांच्या तिकिटांपासून तर महागडे तिकीटही या ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी क्रिकेट शौकिनांती केली. तिकिटे न मिळाल्याने दिवसभर अनेकांनी सोशल माध्यमांवर दिवसभर संताप मांडत खदखद व्यक्त केली. तिकीट विक्रीची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; ५०० चे तिकीट २५०० तर २००० चे ५ हजारांना

काही जुगाड आहे का?

क्रिकेटप्रेमी नागपुरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांना फोन करून तिकिटांचा जुगाड आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. प्रयत्न करूनदेखील तिकीट न मिळाल्याने बहुतांश जणांचा भ्रमनिराश झाला. काहींना एक तर काहींना दोन तिकीट उपलब्ध झाली खरी; मात्र कुटुंबातील प्रत्येकाला सामना पाहण्याची इच्छा असल्याने अनेकांनी चढ्या दराने जवळची तिकिटे विकून टाकली.

जामठ्यात भारताचेच वर्चस्व

जामठा स्टेडियमवर याआधी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले गेले. सर्व पाचही सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. टी-२०त अव्वल असलेला भारतीय संघ आपल्या वि विक्रमात आणखी एका विजयाची भर घालण्यास इच्छुक असेल. दुसरीकडे या प्रकारातील विश्वविजेता ऑस्ट्रेलियादेखील जामठा मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर