शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक ...

नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी देखील आरोग्याला अपायकारक ठरू शकते. ‘ओव्हर -हायड्रेशन’चा त्रास जाणवू शकतो. शिवाय किडनीचा आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे, असे युरोलॉजिस्ट तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. आयुर्वेदात पाण्याचा उपयोग करून अनेक रोग बरे करण्याचे उपाय सांगितले आहे. परंतु अधिक प्रमाणात पाणी पिण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल तर साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराला हानी होण्याची भीती असते. विदर्भातील वातावरण बहुतांशवेळा उष्ण व शुष्क राहते. यामुळे सामान्य व्यक्तींनी रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आदर्श आहे. व्यक्तीची उंची, वजन, शारीरिक हालचाली, व्यायामाची पद्धत यावरून पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

-पाणी कमी पिल्यास ही होऊ शकते समस्या

पाणी हे एक जीवनावश्यक आहे. शरीरात सुमारे ६० ते ७० टक्के पाणी असते. मुख्यत: लघवी आणि घाम यांच्याद्वारे दिवसभर शरीर सतत पाणी गमावत असते. व्यायामुळे किंवा उष्णतेमुळे होणाºया ‘डी-हायड्रेशन’मुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. हे रोखण्यासाठी दररोज पेय आणि अन्नामधून भरपूर पाणी मिळणे आवश्यक आहे. कमी पाणी पिल्यास बद्धकोष्ठता, मूत्रमार्ग आणि मूत्राशयातील संक्रमण, किडनी स्टोन किंवा स्किन डिहायड्रेशनसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

-कोणी किती पाणी प्यावे

युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलूकर यांच्यानुसार ५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी साधारण एक लिटर पाणी प्यायला हवे. ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी एक ते दोन लिटर पाणी प्यायला हवे. तर,१५ ते त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे. शारीरिक श्रम जास्त करीत असाल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढूही शकते.

कोट...

मूत्रपिंड सामान्य असेल आणि अधिक पाणी पिल्यास तर पोट फुगणे, मळमळ वाटणे व लघवी अधिक प्रमाणात होणे आदी त्रास होऊ शकतो. पण मूत्रपिंडाचा आजार असेल आणि अधिक पाणी पिल्यास इलेक्ट्रोलाइटचे कार्य बिघडू शकते. छातीत पाणी जमा होऊ शकते. या शिवाय, चेहऱ्यावर व पायावर सूज येऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

-डॉ. धनंजय सेलूकर, विभाग प्रमुख, युरोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल