शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक ...

नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी देखील आरोग्याला अपायकारक ठरू शकते. ‘ओव्हर -हायड्रेशन’चा त्रास जाणवू शकतो. शिवाय किडनीचा आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे, असे युरोलॉजिस्ट तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. आयुर्वेदात पाण्याचा उपयोग करून अनेक रोग बरे करण्याचे उपाय सांगितले आहे. परंतु अधिक प्रमाणात पाणी पिण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल तर साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराला हानी होण्याची भीती असते. विदर्भातील वातावरण बहुतांशवेळा उष्ण व शुष्क राहते. यामुळे सामान्य व्यक्तींनी रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आदर्श आहे. व्यक्तीची उंची, वजन, शारीरिक हालचाली, व्यायामाची पद्धत यावरून पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

-पाणी कमी पिल्यास ही होऊ शकते समस्या

पाणी हे एक जीवनावश्यक आहे. शरीरात सुमारे ६० ते ७० टक्के पाणी असते. मुख्यत: लघवी आणि घाम यांच्याद्वारे दिवसभर शरीर सतत पाणी गमावत असते. व्यायामुळे किंवा उष्णतेमुळे होणाºया ‘डी-हायड्रेशन’मुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. हे रोखण्यासाठी दररोज पेय आणि अन्नामधून भरपूर पाणी मिळणे आवश्यक आहे. कमी पाणी पिल्यास बद्धकोष्ठता, मूत्रमार्ग आणि मूत्राशयातील संक्रमण, किडनी स्टोन किंवा स्किन डिहायड्रेशनसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

-कोणी किती पाणी प्यावे

युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलूकर यांच्यानुसार ५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी साधारण एक लिटर पाणी प्यायला हवे. ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी एक ते दोन लिटर पाणी प्यायला हवे. तर,१५ ते त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे. शारीरिक श्रम जास्त करीत असाल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढूही शकते.

कोट...

मूत्रपिंड सामान्य असेल आणि अधिक पाणी पिल्यास तर पोट फुगणे, मळमळ वाटणे व लघवी अधिक प्रमाणात होणे आदी त्रास होऊ शकतो. पण मूत्रपिंडाचा आजार असेल आणि अधिक पाणी पिल्यास इलेक्ट्रोलाइटचे कार्य बिघडू शकते. छातीत पाणी जमा होऊ शकते. या शिवाय, चेहऱ्यावर व पायावर सूज येऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

-डॉ. धनंजय सेलूकर, विभाग प्रमुख, युरोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल