शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

By admin | Updated: June 9, 2017 17:45 IST

पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना येत्या जुलै महिन्यापासून हवामानाच्या अचूक वेळेचा अंदाज मोफत मिळणार आहे. राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्रांचा लाभ राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.विदर्भामध्ये कोरडवाहू शेती आहे. ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तसेच पश्मिच महाराष्ट्रातील काही जिल्हे कायमचे दुष्काळी असतात. या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज कसा राहील, याची माहिती अत्यंत आवश्यक आहे. पावसात खंड पडला की, दुबार, तिबार पेरणी करावी लागते. तसेच अवकाळी पावसामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. हे केवळ हवामानाच्या अचूक माहितीअभावी घडत असते. त्याकरिता राज्याच्या कृषी खात्याने ‘महावेध हवामानाचा, समृद्ध शेतीचा’ असे अभियान हाती घेतले आहे.शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्याकरिता प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याकरिता महसूल खात्याने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे येथे स्कॉयमेट व्हेदर ही संस्था प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर ती जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. ती माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालय व तालुका कृषी कार्यालयातही हवामानाचा अंदाज उपलब्ध राहणार आहे.प्रत्येक १० मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्या सेवेशी राज्यातील ५० लाख शेतकरी जोडण्यात आलेले आहेत. या ५० लाख शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १० मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे.सौर उर्जेवर चालणार केंद्रस्वयंचलित हवामान केंद्र बंद पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. हे केंद्र सौर उर्जेवर आधारित आहे. त्यामुळे केंद्राची देखभाल करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागणार नाही. केंद्राद्वारे शेतकऱ्यांना तापमान, पर्जन्यमान, सापेक्षा आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आदी माहिती एसएमएसने देण्यात येईल.