शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

By admin | Updated: June 9, 2017 17:45 IST

पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना येत्या जुलै महिन्यापासून हवामानाच्या अचूक वेळेचा अंदाज मोफत मिळणार आहे. राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्रांचा लाभ राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.विदर्भामध्ये कोरडवाहू शेती आहे. ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तसेच पश्मिच महाराष्ट्रातील काही जिल्हे कायमचे दुष्काळी असतात. या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज कसा राहील, याची माहिती अत्यंत आवश्यक आहे. पावसात खंड पडला की, दुबार, तिबार पेरणी करावी लागते. तसेच अवकाळी पावसामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. हे केवळ हवामानाच्या अचूक माहितीअभावी घडत असते. त्याकरिता राज्याच्या कृषी खात्याने ‘महावेध हवामानाचा, समृद्ध शेतीचा’ असे अभियान हाती घेतले आहे.शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्याकरिता प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याकरिता महसूल खात्याने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे येथे स्कॉयमेट व्हेदर ही संस्था प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर ती जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. ती माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालय व तालुका कृषी कार्यालयातही हवामानाचा अंदाज उपलब्ध राहणार आहे.प्रत्येक १० मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्या सेवेशी राज्यातील ५० लाख शेतकरी जोडण्यात आलेले आहेत. या ५० लाख शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १० मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे.सौर उर्जेवर चालणार केंद्रस्वयंचलित हवामान केंद्र बंद पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. हे केंद्र सौर उर्जेवर आधारित आहे. त्यामुळे केंद्राची देखभाल करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागणार नाही. केंद्राद्वारे शेतकऱ्यांना तापमान, पर्जन्यमान, सापेक्षा आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आदी माहिती एसएमएसने देण्यात येईल.