शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र क्रांतीचा पुरावा शंभराव्या वर्षात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:12 IST

नागपूर : करिअर आणि नव्या युगाचे ध्येयशिखर गाठण्यास आतुर असलेल्या नव्या पिढीसाठी इतिहास म्हणजे निव्वळ टाइमपास आहे. त्यात गुंतून ...

नागपूर : करिअर आणि नव्या युगाचे ध्येयशिखर गाठण्यास आतुर असलेल्या नव्या पिढीसाठी इतिहास म्हणजे निव्वळ टाइमपास आहे. त्यात गुंतून वेळ घालविण्यापेक्षा त्या वेळेचा सदुपयोग करावा, अशी त्यांची मानसिक म्हणा वा बौद्धिक स्थिती आहे. त्यांच्यालेखी अवतीभवती असलेल्या खाणाखुणा, ऐतिहासिक पुरावे आणि जिवंत माणसेही निरुपयोगी आहेत. मात्र, काहींसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहेत. असाच एक सशस्त्र क्रांतीचा जिवंत पुरावा नागपुरातील धंतोलीत आहे. इंग्रजांवर बॉम्ब टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक झाली आणि दोन वर्षाच्या खटल्यानंतर ते सुटलेही. त्याच क्रांतिकारक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे.

१९४२ मध्ये इंग्रजांविरूद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वात अहिंसात्मक पद्धतीने भारत छोडो आंदोलन सुरू होते. स्वातंत्र्यलढ्यात अहिंसेसोबतच सशस्त्र क्रांतीचाही मार्ग समांतर पद्धतीने अवलंबिल्या जात होता. त्याचवेळी दुसरे महायुद्धही लढले जात होते. अशा पद्धतीचा तिहेरी विळखा इंग्रजी राजवटीला बसला होता. नागपुरातही सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनेकांनी स्वीकारला होता. राजा देशपांडे हे त्यांच्यापैकीच एक आणि ते तेव्हा १७ वर्षाचे होते. बालाजी पटेकर, नोटू सिन्हा, एन.एल. राव, आनंदराव कळमकर हे त्यांचे साथीदार. हे एकही साथीदार आता हयात नाहीत. राजा देशपांडे यांनी धंतोलीच्या आपल्या घरातच बंगालच्या परिमल घोष यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याचा उपयोगही ठरला. मात्र, ते पकडल्या गेले. इतिहासात तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून याची नोंदही आहे. दोन वर्षे तुरुंगवास झाला. खटल्यातून मुक्तताही झाली आणि पुढे तीनच वर्षानंतर भारत स्वतंत्रही झाला. विशेष म्हणजे ज्या दादासाहेब शेवडे यांनी देशपांडे यांचा खटला लढला, पुढे त्यांचीच भाची सुधा पटवर्धन यांच्यासोबत विवाह झाला. आज त्या ९५ वर्षाच्या आहेत.

* जिथे जन्म तिथेच शंभरी

ज्या घरात जन्म झाला, त्याच घरात वयाची शंभरी करणारी प्रकरणे फारच दुर्मिळ असतात. तोच योग राजा देशपांडे यांनी साधला आहे. धंतोली येथील घरातच त्यांचा जन्म झाला आणि येथेच ते वयाची शंभरी पूर्ण करत आहेत. विशेष म्हणजे, याच घरात त्यांच्या वैवाहिक आयुष्याला ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा मोठा मुलगा अजित हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत तर दुसरा मुलगा अनिल हे माजी रणजीपटू आहेत आणि मुंबईत उद्योजक आहेत. तिसरा मुलगा संजय हे राजा देशपांडे यांच्याच खाण आणि क्रशरच्या व्यवसायात आहेत. मुलगी नाशिकला असते.

* सातव्या वर्षीच हरवले मातृ-पितृछत्र

सात वर्षाचे असतानाच राजा देशपांडे यांचे आई आणि वडील दोघेही गेले. त्यानंतर त्यांचे मामा पिंगळे यांनी त्यांचे संगोपन केले. सुळे हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीला २५ वर्षे पूर्ण झाली असल्याच्या सोहळ्यात त्यांना भारत सरकारतर्फे ताम्रपट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.

..............