शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात कार्य करावे

By admin | Updated: October 30, 2014 00:47 IST

देवेंद्र मुख्यमंत्री झाले म्हणून मी नोकरी करू नये, यात मला अर्थच वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रगतीसाठी धडपडत असते. देवेंद्रने स्वत:च्या प्रतिभेने आणि कामाने मुख्यमंत्री पद गाठले.

नोकरी करणारच : अमृता फडणवीस देवेंद्र मुख्यमंत्री झाले म्हणून मी नोकरी करू नये, यात मला अर्थच वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रगतीसाठी धडपडत असते. देवेंद्रने स्वत:च्या प्रतिभेने आणि कामाने मुख्यमंत्री पद गाठले. राजकारण आणि समाजकारण हे त्यांचे क्षेत्र आहे. मी बँन्कर आहे. ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही मी नोकरी करीत होते आणि भविष्यातही करणारच. पती देवेंद्र यांचीही त्यासाठी काहीही हरकत नाही, त्यामुळे नोकरी करीत राहणार, असे मत देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र मुख्यमंत्री झालेत तरीही माझे काम सुरू राहणार आहे. कारण ते माझे क्षेत्र आहे. मुळात राजकारणाच्या निमित्ताने देवेंद्र सातत्याने व्यस्त असतात. अनेकदा ते घरीही येऊ शकत नाहीत. त्यामुळे घरी राहण्यापेक्षा नोकरी केल्याने मलाही माझ्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. याशिवाय प्रत्येक स्त्रीने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपायला हवे. तिनेही आपल्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्याचा प्रयत्न करीत राहणे व्यक्ती म्हणून मला महत्त्वाचे वाटते. नोकरी आणि घर सांभाळून अमृता पती देवेंद्रच्या यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यासह खंबीरपणे उभ्या आहेत. देवेंद्र यांनाही अमृता यांनी त्यांच्या क्षेत्रात काम करीत राहावे आणि ज्ञानार्जन करीत राहावे, असे वाटते. देवेंद्र आणि अमृता या दोघांनाही अर्थशास्त्राची आवड आहे. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या बाजूंवर त्यांची चर्चा होते. यावेळी अमृता यांना असलेले ज्ञान आणि बाजारपेठेतील उलाढालींबद्दल त्या देवेंद्र यांच्याशी चर्चा करीत असतात. फडणवीसांचा संतापही संयमीच देवेंद्र फडणवीस संतापी आल्याचे फारसे ऐकिवात नाही आणि कुणी त्याचा अनुभवही घेतला नाही. पण देवेंद्र यांना संताप मात्र नक्की येतो. आपल्याला संताप आलेला आहे आणि आपण रागावलो आहोत, हे ते भासू देत नाहीत. देवेंद्र संताप आल्यावर जरा आवाज वाढवून दोन वाक्य बोलतात आणि आपली नाराजी व्यक्त करतात. पण त्यानंतर थोड्याच वेळात ते नॉर्मल झाले असतात. एखादे काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो, असे त्यांच्यासह काम करणारे त्यांचे स्वीय सहायक चेतन मोरे यांनी सांगितले.