शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

कधी स्वीकारले, कधी नाकारले

By admin | Updated: September 5, 2014 01:10 IST

१९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना

विधानसभेत अपक्षांनी दिले : प्रस्थापितांना धक्केनागपूर : १९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना नाकारलेसुद्धा. त्यामुळे आगामी निवडणुकीत अपक्षांचे काय होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.१९६२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील तीनपैकी दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. नागपूर-१ मधून विनायक सखाराम दांडेकर या अपक्ष उमेदवाराने काँग्रेसचे मदनगोपाल अग्रवाल यांचा पराभव केला होता. तर नागपूर-२ या मतदारसंघातून धोंडबाजी हेडाऊ यांनी काँग्रेसचे प्रतापसिंह लक्ष्मणराव भोसले यांचा पराभव केला होता. नागपूर-३ मधून रिपाइंचे डी.पी. मेश्राम विजयी झाले होते. बाकी सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.१९६७ मध्ये काटेलमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. जे.एस. चांडक यांनी काँग्रेसचे नेते एस.डी. गेडाम यांना पराभूत करून विजयश्री प्राप्त केली होती. जिल्ह्यातील दहापैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या.१९७२ ते १९९० या दरम्यान विधानसभेच्या एकूण पाच निवडणुका झाल्या. पण जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात अपक्षांना बाजी मारता आली नाही.१९९५ ची निवडणूक अपक्षांसाठी सुवर्णकाळ ठरली. जिल्ह्यातून पाच उमेदवार विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्ये उमरेडमधून वसंत इटकेलवार यांना संधी मिळाली तर २००४ च्या निवडणुकीत सुनील केदार अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीतही अपक्षांच्या पदरी पराभवच आला. आता २०१४ ची निवडणूक आहे. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रात भाजप आघाडीला संपूर्ण बहुमत दिले. त्यामुळे अपक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही युती आणि आघाडी संपूर्ण बहुमतासाठीच प्रयत्न करणार असली तरी दोन्ही बाजूने काही अपक्षही पेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जनता यंदा अपक्षांना किती महत्त्व देते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)