शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला मिळाली स्वायत्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला अखेर स्वायतत्ता मिळण्याचा मार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला अखेर स्वायतत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भातील प्रस्ताव व शिफारशींना मंजुरी दिली आहे. शुक्रवारी याची माहिती संस्थेला देण्यात आली. मागील ३० वर्षांपासून स्वायत्तता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू होते.

संस्थेला १० वर्षांसाठी स्वायत्तता मिळाली आहे. हा अवधी संपल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परत संस्थेच्या कार्याची समीक्षा करण्यात येईल. २०२१-२२ या सत्रापासून ही स्वायतत्ता लागू होईल.

१३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूने ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चा दौरा केला होता. दोन दिवसीय पाहणीनंतर समितीने २० फेब्रुवारी रोजी आयोगाला अहवाल सादर केला होता, अशी माहिती संचालक डॉ. रामदास आत्राम यांनी दिली.

स्वायत्ततेचे हे होणार फायदे

-‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला स्वत:चा अभ्यासक्रम तयार करता येईल.

- विद्यार्थ्यांची परीक्षादेखील संस्था घेऊ शकेल.

- संशोधनाला प्रोत्साहन मिळेल.

- ‘आऊटडेटेड’ अभ्यासक्रम हटवून नवीन अभ्यासक्रम आणता येतील.

- नवीन अभ्यासक्रम कमी वेळात लागू करता येईल.

१९९० मध्ये झाला होता पहिला प्रयत्न

संस्थेला स्वायतत्ता मिळवून देण्यासाठी १९९० मध्ये पहिल्यांदा प्रयत्न झाला होता. मात्र नागपूर विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले व प्रस्ताव संमत होऊ शकला नाही. २००८ मध्येदेखील प्रयत्न झाले, मात्र विद्यापीठाकडून मंजुरी मिळू शकली नाही. २०१५ मध्ये तत्कालीन संचालक डॉ. भारंबे यांनी प्रयत्न केले. मात्र विद्वत्‌ परिषदेची मंजुरी मिळाल्यावर पुढे काहीच पावले उचलण्यात आली नाही. २०१८ मध्ये यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला व २०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने पाहणी समिती गठित केली.

जुन्या विद्यार्थ्यांकडून स्वागत

‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून शिकलेले विद्यार्थी देश-विदेशात स्थायिक झाले असून, सर्वच क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. संस्थेला स्वायत्तता मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच शिक्षकांमध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. स्वायत्ततेमुळे शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.