शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

समायोजनानंतरही शिक्षक संख्येचे गणित बिघडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST

नागपूर : मागील काही महिन्यांपासून रखडलेली शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करून शिक्षक संख्येचा समतोल साधण्याचा प्रयत्न ...

नागपूर : मागील काही महिन्यांपासून रखडलेली शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करून शिक्षक संख्येचा समतोल साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात आला. परंतु समायोजनानंतरही जिल्ह्यात शिक्षकांची ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे समायोजनानंतरही जिल्ह्यात शिक्षक संख्येचे गणित बिघडलेलेच आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे नवीन शिक्षक भरती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक मिळणे शक्य नाही.

ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी ३० सप्टेंबर संदर्भदिन पकडून ३१ ऑक्टोबरपूर्वी शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया ठरावीक वेळेत पूर्ण होत नाही. २०२०-२१ ची समायोजन प्रक्रिया नुकतीच पार पडली. परंतु वाढलेली पटसंख्या, मागील काही वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या व अनेक वर्षापासून बंद असलेली शिक्षक भरती यामुळे शिक्षक संख्येचा ताळमेळ जुळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही संपूर्ण जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. सोबतच केंद्र प्रमुखांची १०१ पदे सुद्धा रिक्त आहेत.

- रिक्त पदे

सहा. शिक्षक मराठी माध्यम - २०५

सहा. शिक्षक हिंदी माध्यम - ३

- विषय पदवीधर शिक्षक

भाषा - ९५

विज्ञान - १२

समाजशास्त्र - १८

इतर - १२५

- अनेक शाळांमध्ये विषय शिक्षकच नाहीत

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरिता विषय निहाय प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु, सहायक शिक्षकांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक उपलब्ध असूनही फेब्रुवारी २०१८ पासून जिल्हा परिषद प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया पार न पडल्यामुळे विषय शिक्षकांची १२५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये इयत्ता ६ ते ८ करिता एकही विषय पदवीधर शिक्षक नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे जवळपास दीडशे शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे

- केंद्रप्रमुखांच्या पदांचा प्रभार शिक्षकांकडेच

केंद्रप्रमुखांच्या रिक्त असलेल्या १०१ पदांचा प्रभार सुद्धा शिक्षकांकडेच आहे. त्यामुळे हे शिक्षक सुद्धा पूर्णवेळ अध्यापन कार्य करू शकत नाहीत.

- २००७ पासून शिक्षकांची नवीन भरती प्रक्रियाच झाली नाही. तर ३ वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडून विषय पदवीधर शिक्षक पदाकरिता पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहाय्यक शिक्षक व विषय पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या दोन्ही प्रक्रियेकरिता राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासन दोन्ही स्तरावर संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता शासनाने त्वरित नवीन शिक्षक भरती करावी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून विषय पदवीधर शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

- शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये नुकतीच शिक्षक समायोजन प्रक्रिया पार पडली. परंतु अजूनही अनेक सहाय्यक शिक्षक आणि विषय शिक्षकाच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने शिक्षक भरती करावी.

प्रमोद लोन्हारे, विदर्भ विभागीय समन्वयक,

महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा