शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

५ वर्षांनंतरही विदर्भ विकासाचा आराखडा अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : विदर्भातील १२० तालुक्यांपैकी ६० तालुके हेे मानव विकास निर्देशांकात माघारलेले आहेत. वर्धा सोडून उर्वरित सर्व ...

कमल शर्मा

नागपूर : विदर्भातील १२० तालुक्यांपैकी ६० तालुके हेे मानव विकास निर्देशांकात माघारलेले आहेत. वर्धा सोडून उर्वरित सर्व १० जिल्ह्यांतील हे तालुके आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार या १० जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करावयाचा होता; परंतु प्रशासनिक निष्काळजीपणा व उदासीनतेत अडकून हे काम ५ वर्षांतही पूर्ण होऊ शकलेले नाही.

विदर्भात वर्धा जिल्हा सोडला तर उर्वरित सर्व जिल्हे हे मानव विकास निर्देशांकात मागासलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी २०१६ मध्ये जारी केलेल्या दिशा-निर्देशानुसार या जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यास सांगितले होते; परंतु अजूनही वर्धा, भंडारा, अमरावती आणि अकोला हे जिल्हे अहवाल तयार करू शकलेले नाहीत. नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांनी आराखडा तयार केला. त्याचा अहवालही सादर केला; परंतु सध्या हा अहवाल धूळ खात पडला आहे. या अहवालांच्या शिफारशींवर कुठलाही पुुढाकार घेण्यात आलेला नाही. ज्या विदर्भ विकास मंडळाच्या माध्यमातून हे अहवाल तयार करण्यात आले होते ते मंडळच सध्या प्रभावहीन झाले आहे. ३० एप्रिल २०२० रोजी याचा कार्यकाळ संपला आहे. या विषयातील तज्ज्ञांनुसार मंडळाच्या कार्यकाळ विस्तारासाठी आता राष्ट्रपतींकडूनच पुढाकार घेण्याशिवाय पर्याय नाही. मंडळाचा कार्यकाळ समाप्त होताच विकास आराखडा तयार करण्याचे कामच बंद झाले आहे.

विदर्भ विकास मंडळातील सूत्रांनुसार हे काम राज्य सरकार किंवा स्वीकृत एजन्सीद्वारे होणार होते. मंडळाच्या बैठकीत संस्थांच्या सादरीकरणानंतर या कामांचे वितरण करण्यात आले; परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये हे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. एजन्सींशी जुळलेल्या सूत्रांनुसार या कामासाठी जिल्ह्यात व्यापक सर्वेक्षण करणे बंधनकारक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. वेळेवर पैसे न मिळाल्याने काम प्रभावित होत आहे. दुसरीकडे वित्त विभाग वेळेवर निधी जारी करीत आहे; परंतु कोषागारात बिल अडकत आहे. विदर्भात जे तालुके मानव विकास निर्देशांकात मागासलेले आहेत. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर व रामटेक तालुक्यांचा समावेश आहे. त्याचप्रकारे बुलडाणा येथील ७, अकोला-१, अमरावती-२, यवतमाळ-७, भंडारा-५, गोंदियातील ८ तालुक्यांना याचा लाभ मिळेल. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील सर्वाधिक प्रत्येकी ११ तालुक्यांचा समावेश आहे.

एटीआरचा पत्ता नाही

कुठलाही विकास आराखडा किंवा शासकीय रिपोर्ट तेव्हाच सार्थ ठरतो जेव्हा तो स्वीकृत केल्यानंतर त्याच्या शिफारशींचा ॲक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) तयार होतो; परंतु विदर्भातील ज्या जिल्ह्यांचा विकासासंदर्भातील अहवाल तयार आहे त्याचा कुठलाही एटीआर नाही. राज्यपाल कार्यालयाकडून मिळाल्यानंतरही रिपोर्ट वित्त विभागात थंड बस्त्यात पडला आहे.

अहवालातील शिफारशींवर अंमल व्हावा, अनेक जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार नाही ही वस्तुस्थिती आहे; परंतु ज्या जिल्ह्यांचा रिपोर्ट (अहवाल) तयार आहे. त्यातील शिफारशींकडेही लक्ष दिले जात नाही. हा अहवाल अतिशय मेहनतीने तयार करण्यात आला आहे. यातील शिफारशी मान्य करून त्यावर कारवाई व्हावी, अंमल व्हावा, असे विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायन यांनी सांगितले.