शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्षीही दंडकारण्य स्वातंत्र्योत्सवापासून अनभिज्ञ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST

- नक्षल्यांचे सावट कधी संपणार : भूसुरुंग, बंदुकीच्या गोळ्यांच्या धास्तीत जगतात आदिवासी प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

- नक्षल्यांचे सावट कधी संपणार : भूसुरुंग, बंदुकीच्या गोळ्यांच्या धास्तीत जगतात आदिवासी

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून भारताचे स्वातंत्र्य आज ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने मातीपासून ते ब्रह्मांडापर्यंत भरारी घेतली आहे. मात्र, श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्यात आजही विकासाची ज्योत प्रज्वलित झालेली नाही. आजही येथील लोक अर्धनग्न अवस्थेत असतात. शिक्षणाचा तर प्रश्नच उरत नाही. महामार्ग मंजूर झालेले आहेत. मात्र, ते केवळ कागदावरच आणि नक्षल्यांचे तांडव येथील आदिम जमात राजरोस अनुभवत असते. स्वातंत्र्य म्हणजे काय हो... असा प्रश्न येथील आदिम मोडक्यातोडक्या मराठीत आपणास विचारत असतात.

दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील दुर्गम भागातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी भामरागड तालुक्यातील ११७ लोकवस्ती असलेल्या बंगाडी या छोट्या गावात प्रवेश केला आणि इतर गोष्टी तर सोडाच ‘स्वातंत्र्यदिन म्हणजे काय’ हा प्रश्न कानी पडला. हा प्रश्न उपस्थित झालेल्या गावात भुसूरुंग, बंदुकीच्या गोळ्या यांचा परिचय आहे आणि त्याची धास्तीही प्रचंड आहे. तेव्हापासून नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतर असलेल्या या गावात शैक्षणिक, वैद्यकीय कामे करण्यासाठी ही मंडळी दर आठवड्याला पोहोचत असतात. याच वर्षी २६ जानेवारीला गणराज्यदिन साजरा करत भारताची अस्मिता असलेला तिरंगा ध्वज फडकावला आणि त्याच वेळी विशेष म्हणजे, नक्षल्यांची भीती मिटविण्यासाठी याच गावात उभारण्यात आलेले नक्षली स्मारक कार्यकर्त्यांनी उद्ध्व‌स्त केले. नक्षल्यांच्या जवाबी कारवाईचा धोका माहीत असतानाही नागपूरचे कार्यकर्ते तेथे देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यााठी पोहोचले आहेत.

रुग्णाला उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करावे लागतात

आदिवासी माडिया या आदिम जमातीतील लोकांचे हे गाव. येथे दीड वर्षापूर्वी वीज पोहोचली. मोबाईल नेटवर्क नाहीच. रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा स्वप्नांच्या गावीच. रुग्णाला उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करून कावड धरून डोंग्याने (नाव) १० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी येथे जावे लागते. प्रकृती जास्तच बिघडली तर लाहेरी येथून १९ किमी अंतरावर असलेल्या भामरागड येथे न्यावे लागते. मात्र, ॲम्ब्युलन्स असते का, हा प्रश्न आहे. भामरागडसाठी सकाळी एकच बस जाते आणि संध्याकाळी परत येते.

नक्षल्यांची भीती दूर करण्यासाठी आम्ही बंगाडीत

भामरागड, लाहेरी, गुंडेनूर, बंगाडी, कुरेनार, बिनागुंडा, कुकामेटा व नंतर छत्तीसगडची सीमा असा हा ३३ किमीचा महामार्ग घोषणा होऊनही बनलेला नाही. कच्चे रस्ते, नक्षल्यांच्या कारवायामुळे येथी आदिम समुदाय दहशतीत असतो. तिरंगा झेंडा लावला तर तो काढला जातो, भारत माता की जय म्हटले तर ठार मारले जाते. अशा स्थितीत जोवर नक्षल्यांची भीती दूर होणार नाही तोवर शैक्षणिक कार्य होणार नाही. ही बाब जाणूनच आम्ही तेथे कार्य सुरू केले आहे.

- दत्ता शिर्के, अध्यक्ष - जनसंघर्ष समिती

....................