शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदैवत म्हणून जलदेवतेची स्थापना

By admin | Updated: May 24, 2017 14:51 IST

आर्वी तालुक्यातील आदिवासी बहुल गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून असा समाजहितोपयोगी निर्णय घेणारे हे देशातील पहिले गाव ठरले आहे.

आॅनलाईन लोकमतवर्धा : जलसंधारणाचे महत्व ओळखलेल्या या काकडधरा या आर्वी तालुक्यातील आदिवासी बहुल गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून असा समाजहितोपयोगी निर्णय घेणारे हे देशातील पहिले गाव ठरले आहे.आर्वी तालुक्यातील अतिदुर्गम भागात काकडधरा गाव आहे. पाणलोट तंत्रज्ञान समजून घेत श्रमकार्याने भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी कायम पुढाकार घेतला. येथेच ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ च्या प्रेरणेमुळे पाणलोट उपचाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानासोबत पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविण्यासाठी गावकऱ्यांनी विविध उपक्रम राबविले. जलसंधारणासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने काम करणारे काकडधरा हे पहिले गाव ठरले. वृक्षारोपण, गावातील पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी शोषखड्डे, पाणी बचाव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण केले. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पुढील पिढीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचविण्याचा एक भाग म्हणून गावामध्ये जलदेवतेची स्थापना करण्याचा निर्र्णय घेतला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाण्याचे महत्व अधोरेखित करण्यासोबतच काकडधरा या गावाने आदर्श निर्माण केला आहे.