शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ग्रामदैवत म्हणून जलदेवतेची स्थापना

By admin | Updated: May 24, 2017 14:51 IST

आर्वी तालुक्यातील आदिवासी बहुल गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून असा समाजहितोपयोगी निर्णय घेणारे हे देशातील पहिले गाव ठरले आहे.

आॅनलाईन लोकमतवर्धा : जलसंधारणाचे महत्व ओळखलेल्या या काकडधरा या आर्वी तालुक्यातील आदिवासी बहुल गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून असा समाजहितोपयोगी निर्णय घेणारे हे देशातील पहिले गाव ठरले आहे.आर्वी तालुक्यातील अतिदुर्गम भागात काकडधरा गाव आहे. पाणलोट तंत्रज्ञान समजून घेत श्रमकार्याने भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी कायम पुढाकार घेतला. येथेच ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ च्या प्रेरणेमुळे पाणलोट उपचाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानासोबत पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविण्यासाठी गावकऱ्यांनी विविध उपक्रम राबविले. जलसंधारणासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने काम करणारे काकडधरा हे पहिले गाव ठरले. वृक्षारोपण, गावातील पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी शोषखड्डे, पाणी बचाव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण केले. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पुढील पिढीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचविण्याचा एक भाग म्हणून गावामध्ये जलदेवतेची स्थापना करण्याचा निर्र्णय घेतला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाण्याचे महत्व अधोरेखित करण्यासोबतच काकडधरा या गावाने आदर्श निर्माण केला आहे.