शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आयएएस लॉबीमुळे जीएसटीमध्ये त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयआरएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी जीएसटीमधील त्रुटींचे खापर आयएएस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आयआरएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी जीएसटीमधील त्रुटींचे खापर आयएएस लॉबीवर फोडले आहे. जीएसटीअंतर्गत कर प्रणाली क्लिष्ट झाली आहे. बोगस इन्व्हॉईसची प्रकरणे वाढत आहेत. सरकारजवळ कराचा निधीच पोहोचत नाही. दुसरीकडे याचे नियंत्रण आयएएस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. कर प्रणालीबाबत अनुभवाची कमी असल्याने ते त्यात बदल करण्यास तयार नाहीत, असा दावा श्रीवास्तव यांनी केला.

नागपुरात आले असता डॉ. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. देशातील सध्याची स्थिती पाहता सेवानिवृत्तीनंतर मी राष्ट्रवादी विकास पक्षाची स्थापना केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल. भाजप देशाच्या नावावर समाजाला विभाजित करण्याचे काम करत आहे. विविध जाती, भाषा, धर्माच्या लोकांना जोडून अखंड भारताचे निर्माण होऊ शकते, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. पक्षात सेवानिवृत्त झालेले अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. शिवाय, सैन्यात सेवा दिलेले सदस्यदेखील आहेत. मतांच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. आम्ही सत्ता नव्हे तर सेवेच्या उद्दिष्टाने राजकारणात आलो आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

लखनऊ, वाराणसीसाठी थेट विमान, रेल्वे हवी

नागपुरात उत्तर प्रदेशातील अनेक लोक राहतात. मात्र, लखनऊ किंवा वाराणसीसाठी येथून थेट विमान नाही. सोबतच नागपुरातून सुरू होऊन उत्तर प्रदेशात जाणारी रेल्वेगाडीदेखील नाही. कमीत कमी नागपुरातून लखनऊ किंवा वाराणसीसाठी थेट विमान किंवा रेल्वे सुरू झाली पाहिजे, असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

आवश्यक वस्तू अधिनियम लागू व्हावा

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरदेखील डॉ. श्रीवास्तव यांनी भाष्य केले. शेतकरी कायद्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर अवैध सावकारांची संख्या वाढेल व शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. आवश्यक वस्तू अधिनियमात सूट दिल्यामुळे महागाई वाढत आहे. त्याच्या तरतुदींची कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कोरोनाच्या मृत्यूची प्रकरणे लपवली

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली. उत्तर प्रदेशातदेखील स्थिती प्रचंड गंभीर झाली. कोरोना काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदीत वाहणारे शव याचेच संकेत देत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मृत्यूची प्रकरणे लपवली, असा आरोप डॉ. श्रीवास्तव यांनी केला.