शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

आयएएस लॉबीमुळे जीएसटीमध्ये त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयआरएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी जीएसटीमधील त्रुटींचे खापर आयएएस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आयआरएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी जीएसटीमधील त्रुटींचे खापर आयएएस लॉबीवर फोडले आहे. जीएसटीअंतर्गत कर प्रणाली क्लिष्ट झाली आहे. बोगस इन्व्हॉईसची प्रकरणे वाढत आहेत. सरकारजवळ कराचा निधीच पोहोचत नाही. दुसरीकडे याचे नियंत्रण आयएएस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. कर प्रणालीबाबत अनुभवाची कमी असल्याने ते त्यात बदल करण्यास तयार नाहीत, असा दावा श्रीवास्तव यांनी केला.

नागपुरात आले असता डॉ. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. देशातील सध्याची स्थिती पाहता सेवानिवृत्तीनंतर मी राष्ट्रवादी विकास पक्षाची स्थापना केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल. भाजप देशाच्या नावावर समाजाला विभाजित करण्याचे काम करत आहे. विविध जाती, भाषा, धर्माच्या लोकांना जोडून अखंड भारताचे निर्माण होऊ शकते, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. पक्षात सेवानिवृत्त झालेले अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. शिवाय, सैन्यात सेवा दिलेले सदस्यदेखील आहेत. मतांच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. आम्ही सत्ता नव्हे तर सेवेच्या उद्दिष्टाने राजकारणात आलो आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

लखनऊ, वाराणसीसाठी थेट विमान, रेल्वे हवी

नागपुरात उत्तर प्रदेशातील अनेक लोक राहतात. मात्र, लखनऊ किंवा वाराणसीसाठी येथून थेट विमान नाही. सोबतच नागपुरातून सुरू होऊन उत्तर प्रदेशात जाणारी रेल्वेगाडीदेखील नाही. कमीत कमी नागपुरातून लखनऊ किंवा वाराणसीसाठी थेट विमान किंवा रेल्वे सुरू झाली पाहिजे, असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

आवश्यक वस्तू अधिनियम लागू व्हावा

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरदेखील डॉ. श्रीवास्तव यांनी भाष्य केले. शेतकरी कायद्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर अवैध सावकारांची संख्या वाढेल व शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. आवश्यक वस्तू अधिनियमात सूट दिल्यामुळे महागाई वाढत आहे. त्याच्या तरतुदींची कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कोरोनाच्या मृत्यूची प्रकरणे लपवली

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली. उत्तर प्रदेशातदेखील स्थिती प्रचंड गंभीर झाली. कोरोना काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदीत वाहणारे शव याचेच संकेत देत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मृत्यूची प्रकरणे लपवली, असा आरोप डॉ. श्रीवास्तव यांनी केला.