शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासाठी हवे ‘कोरोना वर्षा’प्रमाणे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:08 IST

नागपूर : जगात जानेवारीपासून काेराेनाचा विळखा घातला आणि भारतात फेब्रुवारीपासून त्याचे परिणाम दिसू लागले, ते आता २०२० वर्ष संपल्यानंतरही ...

नागपूर : जगात जानेवारीपासून काेराेनाचा विळखा घातला आणि भारतात फेब्रुवारीपासून त्याचे परिणाम दिसू लागले, ते आता २०२० वर्ष संपल्यानंतरही सुरूच आहेत. माणसे घरात बंदिस्त झाली, शाळा बंद झाल्या, नोकऱ्या गेल्या, पायपीट झाली, अर्थशास्त्र कोलमडले, आरोग्य कोलमडले. या कोरोना वर्षाने इतके जेरीस आणले की नको अशी वेळ पुन्हा, कधी जाते एकदाचे हे वर्ष, असे वाटायला लागले. मात्र या वर्षाने एक मात्र सकारात्मक बाब करून दिली. या वर्षात आपल्या पृथ्वीने, पर्यावरणाने मोकळा श्वास घेतला. नद्या, सागर शुद्ध झाले. पक्षी, प्राणी, फुलपाखरे अशा सर्व जीवांसाठी हे वर्ष सुखावह ठरले. युरोपियन स्पेस एजेन्सीने केलेल्या सॅटेलाईट सर्वेक्षणानुसार भारतात व जगातही कार्बन, नायट्रोजन अशा प्रदूषणाचा स्तर निम्म्याने घटला. कोट्यवधी खर्च करून व अनेक वर्षे संशोधन व परिश्रम करूनही ते शक्य झाले नसते. मग हे सर्व झाले कशामुळे? या प्रश्नाचे उत्तर आहे, पर्यावरणात मानवी हस्तक्षेप आणि हव्यास कमी झाल्यामुळे. त्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष आणि भविष्यातही ग्लोबल वाॅर्मिंग व प्रचंड वाढलेला प्रदूषणाचा धोका दूर करायचा असेल तर कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीप्रमाणेच नियोजन करावे लागेल. खरेतर हे आव्हान आहे पण अशक्य नाही. कोरोनाच्या प्रकोपाने हा मार्ग नक्कीच दाखवला आहे.

२०२१ मध्ये अपेक्षा

- पर्यावरणात मानवी हस्तक्षेप कमीत कमी हाेईल, यासाठी नियाेजन.

- आठवड्यात, महिन्यात किमान एक दिवस नाे व्हेईकल डे म्हणून पाळावा लागेल.

- प्रदूषण न करणारी वाहने (सायकल) वापराला प्राेत्साहन हवे. सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे.

- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नियाेजन

- यावर्षी पहिल्यांदा नद्या आपाेआप शुद्ध झाल्या, शहरात फुलपाखरे माेठ्या प्रमाणात दिसली. ही स्थिती निर्माण करण्याची याेजना.

- कारखानदारीतून हाेणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी याेजना आखून काटेकाेर व प्रामाणिक अंमलबजावणी.