शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची; १० हजार कामगारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:15 IST

कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देपरप्रांतीयांनी पाठ फिरविल्याने स्थानिक मजुरांना हाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. नंतर उद्योग सुरू झाल्यानंतर मजुरांअभावी उत्पादन ३० ते ४० टक्के क्षमतेने सुरू आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत, अशी ओरड करणाऱ्यांसाठी आता संधी आहे. सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतींमध्ये १० हजार तांत्रिक कामगार आणि मजुरांना रोजगार मिळण्याची संधी आहे.औद्योगिक वसाहतीतील सर्वच उद्योगांमध्ये कामगार भरती सुरू आहे. ही संधी साधण्याचे आवाहन उद्योजकांनी केले आहे. उद्योजकांनी दिलेल्या हाकेला आता भूमिपुत्रांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परप्रांतीय कामगार परतण्यास वर्ष लागणारऔद्योगिक वसाहतीत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल येथून कामगार कुटुंबीयांसह येतात. कोरोनामुळे जवळपास ८० टक्के म्हणजेच जवळपास ३० हजार कामगार परतले आहेत. उद्योगधंदे सुरळीत झाल्यास वर्षभरात यातील बहुतांश कामगार परत येतील, असा उद्योजकांना अंदाज आहे. त्यापूर्वी भूमिपुत्रांना नोकºयांची संधी साधण्याची गरज आहे. आयटीआय पूर्ण केलेल्यांना तांत्रिक कर्मचारी पदावर जास्त संधी आहे.कामगारांना इंजिनिअरिंगसह सर्वच कारखान्यांमध्ये रोजगार मिळणार आहे. फॉन्ड्री, कास्टिंग ग्राईडिंग, लोडिंग-अनलोडिंग, डिस्पॅच, पॅकिंग, टेक्सटाईल, रसायने, कृषी प्रक्रिया व औषधी उद्योग, पशुखाद्य, फॅब्रिकेशन, कोरेगेटेड बॉक्स तयार करणे, शीतगृहे अशा उद्योगात संधी आहे. या उद्योगांमध्ये कामगारांना पदवी, फारसे शिक्षण किंवा निष्णात कौशल्याची आवश्यकता नाही. तांत्रिक शिक्षण झालेल्या कौशल्यधारक तरुणांसाठी इंजिनिअरिंग मशिनरीवर सुट्या भागांचे उत्पादन, साखर कारखान्यांचे सुटे भाग निर्मिती अशा उद्योगात रोजगार उपलब्ध आहे. आठ तासांसाठी मासिक १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मिळकत राहणार आहे. वसाहतीत अनेक कारखान्यांमध्ये अशा कामगारांची गरज आहे. सर्वच कारखान्यांमध्ये स्वयंचलित यंत्रसामग्रीचा उपयोग करण्यात येत असल्याने अवजड कामांचीही भीती उरली नाही. नोकरीसाठी आयटीआय झालेल्या तरुणांना थेट उद्योजकांशी संपर्क साधता येईल, असे बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :businessव्यवसाय