शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची; १० हजार कामगारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:15 IST

कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देपरप्रांतीयांनी पाठ फिरविल्याने स्थानिक मजुरांना हाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. नंतर उद्योग सुरू झाल्यानंतर मजुरांअभावी उत्पादन ३० ते ४० टक्के क्षमतेने सुरू आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत, अशी ओरड करणाऱ्यांसाठी आता संधी आहे. सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतींमध्ये १० हजार तांत्रिक कामगार आणि मजुरांना रोजगार मिळण्याची संधी आहे.औद्योगिक वसाहतीतील सर्वच उद्योगांमध्ये कामगार भरती सुरू आहे. ही संधी साधण्याचे आवाहन उद्योजकांनी केले आहे. उद्योजकांनी दिलेल्या हाकेला आता भूमिपुत्रांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परप्रांतीय कामगार परतण्यास वर्ष लागणारऔद्योगिक वसाहतीत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल येथून कामगार कुटुंबीयांसह येतात. कोरोनामुळे जवळपास ८० टक्के म्हणजेच जवळपास ३० हजार कामगार परतले आहेत. उद्योगधंदे सुरळीत झाल्यास वर्षभरात यातील बहुतांश कामगार परत येतील, असा उद्योजकांना अंदाज आहे. त्यापूर्वी भूमिपुत्रांना नोकºयांची संधी साधण्याची गरज आहे. आयटीआय पूर्ण केलेल्यांना तांत्रिक कर्मचारी पदावर जास्त संधी आहे.कामगारांना इंजिनिअरिंगसह सर्वच कारखान्यांमध्ये रोजगार मिळणार आहे. फॉन्ड्री, कास्टिंग ग्राईडिंग, लोडिंग-अनलोडिंग, डिस्पॅच, पॅकिंग, टेक्सटाईल, रसायने, कृषी प्रक्रिया व औषधी उद्योग, पशुखाद्य, फॅब्रिकेशन, कोरेगेटेड बॉक्स तयार करणे, शीतगृहे अशा उद्योगात संधी आहे. या उद्योगांमध्ये कामगारांना पदवी, फारसे शिक्षण किंवा निष्णात कौशल्याची आवश्यकता नाही. तांत्रिक शिक्षण झालेल्या कौशल्यधारक तरुणांसाठी इंजिनिअरिंग मशिनरीवर सुट्या भागांचे उत्पादन, साखर कारखान्यांचे सुटे भाग निर्मिती अशा उद्योगात रोजगार उपलब्ध आहे. आठ तासांसाठी मासिक १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मिळकत राहणार आहे. वसाहतीत अनेक कारखान्यांमध्ये अशा कामगारांची गरज आहे. सर्वच कारखान्यांमध्ये स्वयंचलित यंत्रसामग्रीचा उपयोग करण्यात येत असल्याने अवजड कामांचीही भीती उरली नाही. नोकरीसाठी आयटीआय झालेल्या तरुणांना थेट उद्योजकांशी संपर्क साधता येईल, असे बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :businessव्यवसाय