शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बंगालचा संपूर्ण फोकस नंदीग्रामवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे. बंगालच्या राजकारणात या लढतीला दीदी विरुद्ध दादा असे संबोधल्या जात असून, दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली असून, १ एप्रिल रोजी दोन्ही उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होईल.

मागील निवडणुकीत ममता यांनी भवानीपूर येथून निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळेस त्यांनी नंदीग्राममधून उभे राहण्याचा निर्णय घेतला. तृणमूलमधील त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी शुभेंदू अधिकारी यांना भाजपने त्या जागेवरून मैदानात उतरवले. नंदीग्राम व आजूबाजूच्या भागात अधिकारी कुटुंबीयांचा अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे तीनवेळा तेथून खासदार होते व संपुआ सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. स्वतः शुभेंदू १९९५ पासून राजकारणात सक्रिय आहेत. २००६ मध्ये ते तृणमूलच्या तिकिटावरून कंथी येथून जिंकून आले होते. तर २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेत निवडून गेले होते. २०१६ च्या निवडणुकीत नंदीग्राममधून ते जिंकले होते. अधिकारी कुटुंबामुळेच संबंधित भागात तृणमूलला बळकटी मिळाली होती.

या जागेवरून ममता लढत असल्या तरी प्रत्यक्षात त्या प्रचाराला पूर्णवेळ देऊ शकल्या नव्हत्या. मात्र या लढतीचे महत्त्व लक्षात घेता, मागील काही दिवसापासून त्यांच्यासह तृणमूलचे मोठे नेते या भागात प्रचार करत आहेत. तर अधिकारी यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते उतरले.

नंदीग्राममुळे ममतांचा वाढला जनाधार

२००७ साली नंदीग्राममध्ये तृणमूलतर्फे भूमी अधिग्रहण विरोधातील आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनानंतर ममतांचा जनाधार वाढला होता. अधिकारी कुटुंबीयांनी त्यात मोठी भूमिका पार पाडली होती. १४ वर्षांनंतर त्याच अधिकारी कुटुंबातील सदस्याविरोधात ममतांना निवडणूक लढवावी लागत आहे. या निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला नंदीग्राम येथेच ममता यांचा अपघात झाला व त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. भाजपनेच हा हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केला होता.