शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

संप ही आंदोलनाची सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 02:32 IST

शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे.

सरकारने वेळीच दखल घ्यावी : शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांचा सरकारला इशारा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे. या आंदोलनाने पहिल्याच दिवशी सरकारला घाम फोडला आहे. ही केवळ सुरुवात आहे. सरकारने वेळीच याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे. कळमन्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नियमित आवकमहाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नागपुरात बाजारपेठांमध्ये काहीही परिणाम दिसून आला नाही. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ कळमना बाजाराचा फेरफटका मारला असता सर्व बाजारपेठांमध्ये शेतकी मालाची आवक नियमितपणे सुरू होती. कळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव कमलाकर घाटोळे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून सर्व धान्याची आवक कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी नियमितपणे धान्य बाजारात आणले. नागपूर चिली मर्चंट असोसिएशनचे सचिव संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजारात मिरचीचा व्यवहार केवळ सोमवारी होतो. त्यामुळे आंदोलनाचा बाजारात काहीही परिणाम झाला नाही. भाजी बाजाराचे अध्यक्ष नंदकिशोर गौर यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच भाजीपाला बाजारात विक्रीकरिता आणला. याशिवाय कळमन्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, जयपूर येथून भाजीपाला आला. आंदोलन केवळ पश्चिम नागपुरात सुरू आहे. त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे ५० ते १०० एकर जमिनी आहेत. त्यातील बहुतांश शेतकरी आणि नेतेसुद्धा आहेत. ते शेतकी मालाला थेट बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यांचा आंदोलनात सहभाग असल्यामुळे त्यांनी बाजार समितीत भाजीपाला नेला नाही. त्याची झळ त्या भागातील ग्राहकांना बसली. पण नागपुरात आंदोलनाची झळ पोहोचली नाही. कळमना बाजाराचा उपबाजार कॉटन मार्केट भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांनी भाज्या नेहमीप्रमाणे विक्रीसाठी आणल्या. आंदोलनाचा काहीही परिणाम झालेला नाही, असे फळ आणि भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. फळे बाजारात नेहमीप्रमाणे फळांची आवक सुरू होती. शेतकरी आंदोलनाचा परिणाम बाजारात दिसला नाही, असे फळे बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.