शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

रिकामे भूखंड ठरताहेत धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST

दिनकर ठवळे लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : नागपूर शहरालगतच्या बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या हद्दीतील नवीन ले-आऊट तयार करण्याचा ...

दिनकर ठवळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : नागपूर शहरालगतच्या बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या हद्दीतील नवीन ले-आऊट तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. येथील बहुतांश रिकाम्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचल्याने त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले असून, परिसरात गवत व झुडपे वाढली आहेत. या सर्व बाबी मानवी आराेग्यास धाेकादायक ठरणाऱ्या आहेत, असे आराेग्य विभागाने नुकत्याच केलेल्या निरीक्षणात आढळून आले आहे.

बाेखारा येथे नवीन ले-आऊटची निर्मिती हाेत असून, अनेकांनी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने भूखंड खरेदी केले आहेत. गरजूंनी मात्र त्यांच्या भूखंडांवर घरांचे बांधकाम करून त्यात राहायला सुरुवात केली आहे. भूखंडधारकांनी त्यांच्या रिकाम्या भूखंडांकडे दुर्लक्ष केले आहे. या भूखंडांवर कुणाचाही वावर नसल्याने त्यात माेठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. काही भूखंडांवरील पाण्याचा निचरा न झाल्याने दुर्गंधी सुटली आहे. बहुतांश रिकाम्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढले आहे.

या ग्रामपंचायत अंतर्गत चारही बाजूला मोठ्या प्रमाणात नवीन नागरी वस्त्या, औद्योगिक व शैक्षणिक संकुले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाला नागरी सुविधा पुरविणे कठीण जात आहे. भूखंडधारकांनी त्यांचे भूखंड साफ ठेवावे, तसेच न केल्यास त्यांना नाेटीस बजावून दंडात्मक कारवाई करावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काहीच करायला तयार नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

...

मानवी आराेग्यावर प्रश्नचिन्ह

रिकाम्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची प्रचंड पैदास हाेत आहे. याच परिसरात झाडे व झुडपे वाढली असल्याने त्यात साप, विंचू व इतर विषारी कीटक तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही वाढला आहे. डासांमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मलेरिया व कीटकजन्य आजार हाेण्याची तसेच साप व विंचवांमुळे त्यांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. बाेखारा येथील डेंग्यू व मलेरियाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच याेग्य उपाययाेजना कराव्या, असेही पाहणी अहवालात नमूद केले आहे.

...

पाहणी अहवालातील बाबी

बाेखारा येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे गुमथी प्राथमिक आराेग्य केंद्राचे पी. बी. सुरकार व कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी पाहणी अहवाल ग्रामपंचायतला सादर केला. लाेणारा राेडकडे जाणारी पाईप लाईन फुटल्याने माेठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय हाेत आहे. विहिरींचा परिसर गलिच्छ आहे. शिवमंदिर शेजारी असलेल्या टाकीजवळ तसेच इतर ठिकाणचे खड्डे बुजविण्यात न आल्याने ते धाेकादायक बनले आहे. पाण्याचे डबके तयार झाले आहेत. माॅडर्न स्कूलजवळ डबक्यांची संख्या अधिक असून, ते साथीच्या राेगांना निमंत्रण देत आहेत. भूखंडांवरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी. त्यावरील गवत व झुडपे साफ करावी यासह अन्य सूचना या अहवालात नमूद केल्या आहेत.

...

भूखंडधारकांनी त्यांच्या रिकाम्या भूखंडावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी तसेच गवत व झुडपे ताेडून भूखंड साफ करावे. ग्रामपंचायतने दिलेल्या सूचनांचे भूखंडधारकांनी पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- अनिता पंडित,

सरपंच, बाेखारा.